शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

रिक्षा-टॅक्सी, खासगी बसेस व टेम्पोचालक वाहतूक संघटनेला सरकारने मदत द्यावी; राष्ट्रवादीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 1:52 PM

कोरोनामुळे आता परिस्थिती बिकट झाली असून दैनंदिन जीवन कशा पद्धतीने चालणार पुढील एकवीस दिवस कसे चालवणार हा खरा प्रश्न आहे.

मुंबई: मुंबई राज्याची ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबई शहरात जवळपास दोन कोटी इतकी लोकसंख्या मुंबई महानगरीत राहते. संपूर्ण देश व मुंबई लॉक डाउन करणे म्हणजे दोन कोटी लोकसंख्येला घरी थांबायला लावणे. कोरोनामुळे हा निर्णय सरकारला घ्यावा लागला. मुंबई शहरामध्ये 35000 काळीपिवळी टॅक्सी, 65000 खाजगी एसी टॅक्सी हे सर्व बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच खासगी बसेस टेम्पो वाहतूक संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे.या सर्व वाहतूक दारांचे हातावर पोट असल्यामुळे दिवसभर धंदा केला तर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकतो. कोरोनामुळे आता परिस्थिती बिकट झाली असून दैनंदिन जीवन कशा पद्धतीने चालणार पुढील एकवीस दिवस कसे चालवणार हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी, खासगी बसेस व टेम्पो चालक वाहतूक संघटनेला राज्य सरकारने मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते अँड.अमोल मातेले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका ईमेलद्वारे पत्र पाठवून  केली आहे.

दिवसभर मुंबई शहरांत टॅक्सी, रिक्षा, टेम्पो चालक मालक व खासगी बसेस यांनी जर काही काम धंदा केला तरच त्यांच्या घरची चूल पेटवू शकते. या सर्व लोकांचे हातावर पोट असल्यासारखी एकंदरीत परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत वाहनांचे बँकेचे कर्ज असते त्याच बरोबर इतर काही खर्च असतात. तरी यासाठी राज्य सरकारने काहीतरी उपाययोजना करून रिक्षा-टॅक्सी, खासगी बसेस व टेम्पो चालकांचे दैनंदिन जीवन सुरळीत चालण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका त्यांनी लोकमतकडे विषद केली.