शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 7:22 PM

केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यातील शेतक-यांची दुरावस्था झाली आहे. दूध उत्पादक शेतक-यांना तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे.

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यातील शेतक-यांची दुरावस्था झाली आहे. दूध उत्पादक शेतक-यांना तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे. या विरोधात शेतक-यांनी पुकारलेल्या आंदोलनाला  काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे असे सांगून शेतक-यांनी दुधाची नासाडी करू नये असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.       

यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाला दूध उत्पादक शेतक-यांच्या समस्यांबाबत व सरकार निर्मित संकटाला ज्या परिस्थितीत शेतकरी सामोरे जात आहेत, त्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. शेतक-यांच्या प्रश्नांबाबत सरकारची अनास्था आणि सरकारने केलेली उपेक्षा शेतक-यांच्या दुरावस्थेला कारणीभूत आहे. शेतक-यांना आंदोलन करण्याकरिता सरकारनेच भाग पाडले आहे त्यामुळे सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तात्काळ आंदोलक शेतक-यांशी चर्चा करून शेतक-यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे खा. चव्हाण म्हणाले.

दूध हा जीवनाश्यक वस्तूंमध्ये मोडणारा घटक आहे. दूध उत्पादक शेतक-यांच्या समस्यांसाठी सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा त्यात कोणताही दोष नाही. त्यामुळे शेतक-यांनी दुधाची नासाडी करू नये आणि सामान्य नागरिकांना झळ पोहोचू नये याची काळजी घ्यावी अशी विनंती काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आंदोलक शेतक-यांना केली आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMilk Supplyदूध पुरवठाMaharashtraमहाराष्ट्र