शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
2
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
3
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
4
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
5
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
6
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
7
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
8
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
9
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
10
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
11
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; म्हणे, मुलीचा चेहरा प्रियकराला दाखवायचाय!
12
शेअर बाजारात आधी घसरण मग सावरला; सेन्सेक्समध्ये ३५ अंकांची तेजी, निफ्टी २५,९९५ च्या पुढे
13
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
14
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
15
भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला
16
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
17
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
18
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
19
Bike Taxi: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपिडो, उबेर 'ला बसणार दणका; कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार
20
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने गरीब शेतकऱ्यांच्या हाती ‘लेखी जुमला’च दिला - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 19:13 IST

सरकारच्या जुमलेबाजीचा निषेध करीत सत्तेवर बसलेल्या जुमलेबाजांशी निकराने लढा देण्याकरिता चालत आलेल्या गरीब शेतकऱ्यांच्या हाती सरकारने शेवटी ‘लेखी जुमला’च दिला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई -  सरकारच्या जुमलेबाजीचा निषेध करीत सत्तेवर बसलेल्या जुमलेबाजांशी निकराने लढा देण्याकरिता २०० कि.मी. अंतर रक्ताळलेल्या पायांनी चालत आणि सरकार मागण्या मान्य करेल या आशेने हजारोंच्या संख्येने मुंबईत आलेल्या गरीब शेतकऱ्यांच्या हाती सरकारने शेवटी ‘लेखी जुमला’च दिला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले, हजारो शेतक-यांचा किसान लाँग मार्च मुंबईत धडकल्यावर झोपलेल्या सरकारला जाग आली आणि सरकारने शेतक-यांना चर्चेसाठी बोलावले. गेल्या सहा दिवसांपासून हे शेतकरी रखरखत्या उन्हात उपाशीपोटी पाय रक्तबंबाळ झाले तरी मुंबईच्या दिशेने निघाले होते तेव्हा सरकार झोपले होते. भाजपच्या खासदारांनी तर मोर्चेकरी शेतकरी बांधवाना ‘शहरी माओवादी’ म्हटले तर मुख्यमंत्र्यांनी लाँग मार्चमध्ये सहभागी झालेले 95टक्के लोक शेतकरी नाहीत असे म्हणून मोर्चेकरी शेतक-यांची हेटाळणी केली. तर दुसरकीकडे भाजपच्या पेड ट्रोल्सनी समाज माध्यमातून या किसान लाँग मार्च ची बदनामी करण्याचा जोरदार प्रयत्न केला. औपचारिकता म्हणून सरकारने शेतक-यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून शेतक-यांच्या काही मागण्या मान्य केल्या असे लेखी आश्वासन दिल्याचे जाहीर केले.

SLBC ने दिलेल्या यादीनुसार ८९ लाख शेतक-यांचे ३४ हजार कोटींचे कर्ज माफ करणार असे सरकारने जाहीर केले होते. सदर आकडेवारी ही २००१ पासून थकित असलेल्या तसेच २००८ च्या कर्जमाफीत अंतर्भूत न झालेल्या शेतक-यांसहित होती. असे असतानाही जाहीर केलेल्या कर्जमाफीत लाभार्थ्यांची संख्या २००१ पासून दाखवायची आणि प्रत्यक्षात २०१२ ते २०१६ या चार वर्षातल्या थकीत शेतक-यांनाच कर्जमाफी देण्याचा घाट सरकारने घातला होता. काँग्रेस पक्षाने सरकारचा हा बनाव उघडा पाडल्यानंतर सरकारने साळसूदपणे गुपचूप कर्जमाफीची व्याप्ती तीन वर्षाने वाढवली व २००९ ते २०१६ पर्यंत थकीत कर्ज असणा-या शेतक-यांना कर्जमाफी देण्याचे जाहीर केले. यावर २००९ हे कर्जमाफीकरिता जाहीर केलेले वर्ष कोणत्या निकषावर आले आहे?  अशी विचारणा करून काँग्रेस पक्षाने २००९ च्या आधीपासूनच्या सर्व थकीत कर्जांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी केली होती. तसेच कर्जमाफीची मर्यादा वाढवून ३० जून २०१७ पर्यंत थकीत कर्ज असणा-या शेतक-यांचा कर्जमाफीत समावेश करावा अशी मागणीही केली होती. ही मागणी त्याचवेळी मान्य केली असती तर हजारो शेतक-यांना एवढ्या हाल अपेष्ठा सहन कराव्या लागल्या नसत्या. अजूनही अर्बन बँका, पतसंस्था,मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतलेले शेतकरी कर्जमाफीच्या परिघाबाहेर आहेत. सरकार कर्जमाफीच्या अंमलबजावणीतही चालढकल करित असून सरकारने जाहीर केलेल्या संख्येच्या एक तृतीयांश शेतक-यांनाही अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. दीड लाखांची मर्यादा काढून सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली होती.काँग्रेस पक्ष या मागणीवर कायम आहे. दीड लाखांची मर्यादा काढण्यासंदर्भात तसेच कुटुंबाच्या व्याख्येसंदर्भात कोणतेही ठोस आश्वासन सरकारने दिलेले नाही. बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतक-यांना मदतीच्या संदर्भात किंवा इतर अन्य मागण्यासंदर्भात सरकारने शेतक-यांना कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. २०१६ नंतरची थकीत कर्ज माफ करण्याबाबत कोणतीही कारवाई न करता सरकारने केवळ विचार करू अशा त-हेची आश्वासने दिली आहेत. विचार करू, समिती नेमू अशा त-हेच्या लेखी आश्वासनांतून शेतक-यांच्या हाती फार काही पडणार नसून हा सरकारचा एक लेखी जुमलाच आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले तसेच गेल्या तीन वर्षापासून शेतक-यांसाठी सुरु असलेला काँग्रेस पक्षाचा लढा रस्त्यावर आणि  विधिमंडळात सुरुच ठेवेल असे ते म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसKisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च