शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

एसटी कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती शासनाच्या मंजुरीत अडली, २६०० जणांची संमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 09:43 IST

ST employees : सहा महिन्यांपूर्वी घोषित करण्यात आलेल्या या योजनेसाठी २,६०० जणांनी संमती दर्शविली होती.  

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेतील ५० वर्षे वयावरील कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली स्वेच्छानिवृत्ती योजना शासनाच्या मंजुरीत अडकली आहे. सहा महिन्यांपूर्वी घोषित करण्यात आलेल्या या योजनेसाठी २,६०० जणांनी संमती दर्शविली होती.  

खर्चात बचतीच्या दृष्टीने ही योजना आखण्यात आली आहे. योजना जाहीर झाली त्यावेळी ५० वर्षे वयावरील २७ हजार अधिकारी, कर्मचारी होते. या सर्व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली तर  किमान १०० कोटींची बचत होईल  असा अंदाज बांधला होता. प्रत्यक्षात २,६०० कर्मचाऱ्यांनी संमतिपत्र भरून दिले असून तोही प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहे.

सद्य:स्थितीत महामंडळाचा वेतनावर २९० कोटी रुपये खर्च होत आहे. २७ हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती दिल्यास १,४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. शासनाकडून ही रक्कम मिळावी, अशी अपेक्षाही करण्यात आली. योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्याला एका वर्षात तीन महिन्यांचे वेतन, उपदान आणि आनुषंगिक लाभाचा खर्च यामध्ये धरण्यात आला होता.  

थोडाफार बदल करून योजना राबविण्यात यावी. संख्या कमी झाल्यास कार्यरत कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देता येईल. ते आणखी उत्साहाने, कुशलतेने कामे करतील. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, एसटी कर्मचारी काँग्रेस

टॅग्स :state transportएसटीMaharashtraमहाराष्ट्र