शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

सरकारची कर्जमाफी फसवी, शेतक-यांमध्ये भेद निर्माण करणारी: राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 4:57 AM

महाराष्ट्रातील सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असून, शेतक-यांमध्ये भेद निर्माण करणारी आहे. सरसकट कर्जमाफीसाठी आम्ही सरकारला भाग पाडू

परभणी : महाराष्ट्रातील सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असून, शेतक-यांमध्ये भेद निर्माण करणारी आहे. सरसकट कर्जमाफीसाठी आम्ही सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शेतक-यांना दिली.पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय आणि शेतक-यांशी खा. गांधी यांनी आस्थेवाईक संवाद साधला.या कार्यक्रमासाठी छोटेखानी मंच उभारला होता. सुरुवातीला १३ शेतक-यांनी खा. गांधी यांचा सत्कार केला. त्यानंतर एरंडेश्वर येथील शेतकरी बालासाहेब काळे यांनी शेतकºयांच्या अडचणी मांडण्यास सुरुवात केली. राज्य शासनाने दिलेली कर्जमाफी फसवी आहे, कर्जमाफीच्या अर्जांसाठी अनेक अडचणी येत आहेत. दररोज नवा जी.आर. निघत असून, नवीन कर्ज मिळत नाही. जुन्या कर्जांची माफी होत नाही, या परिस्थितीमुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत, असे सांगितले.शेतकरी आपल्या समस्या मांडत असतानाच खा. गांधी अचानक मंचावरून उठले, सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेल्या लाकडी कठड्यामधून थेट समस्या मांडणाºया शेतकºयांमध्ये येऊन मांडी घालून बसले. त्यानंतर शेतकºयांचा उत्साह आणखीच वाढला. एक-एक करीत शेतकरी गाºहाणे मांडत होते. प्रा. व्यंकटराव काळे, अण्णासाहेब काळे, राजू काळे आदींनी राज्य शासनाकडून अडवणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी खा. राहुल गांधी यांनी शेतकºयांना अनेक प्रश्न विचारले. त्यात तातडीचे १० हजार रुपये मिळाले का, गावाची लोकसंख्या किती आहे आणि किती जणांना कर्जमाफी झाली, असे प्रश्न करताच गावक-यांनी एकालाही कर्जमाफी मिळाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर खा. राहुल गांधी यांनी राज्य सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून, संपूर्ण कर्जमाफी देण्यास शासनाला भाग पाडू, असे अभिवचन दिले. शेतक-यांशी संवाद साधल्यानंतर राहुल गांधी यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरी