शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

भाजप सरकार बिल्डर, इस्टेट वाल्यांचे आहे : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 15:48 IST

माढा तालुक्यातील अरण येथे माळी समाज सत्तासंपादन महामेळावा

ठळक मुद्दे- प्रकाश आंबेडकरांची भाजप सरकारवर जोरदार टिका- माळी समाजाच्या सत्ता संपादन महामेळाव्यात आंबेडकरांची भाजप सरकारवर ताशेरे- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातवरण तापले

अरण: आताच्या सरकारवर कोणाचा विश्वास नाही आणि सरकारचाही कोणावर विश्वास नाही. हे सरकार बिल्डर आणि इस्टेट वाल्यांचं सरकार आहे. ३३००० कुटुंबे देश सोडून गेली आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी केली.

माळी समाज सत्ता संपादन महामेळाव्यात अरण येथे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शंकरराव लिंगे होते. प्रारंभी आंबेडकर यांचा सत्कार महात्मा फुले यांची पगडी घालून आणि संत शिरोमणी सावता महाराजांचे खुरपे देऊन करण्यात आला. सभेला वंचित बहुजन आघाडीचे महासचिव शाहीर सचिन माळी, बाळापूरचे आमदार बळीराम शिरस्कर, सासवड माळी शुगरचे रंजनभाऊ गिरमे, गोपीचंद पडळकर, अ‍ॅड. अशोक ताजने, शिवानंद हैबतपुरे, आण्णाराव पाटील, महिला आघाडी अध्यक्षा किरणताई गिºहे, डॉ. अरुणा माळी, बाबासाहेब माळी, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, आनंद चंदनशिवे, बाळासाहेब माळी, पोपट माळी, सचिन गुलदगड उपस्थित होते. 

यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना शंकरराव लिंगे यांनी माळी समाजाला विधानसभेत लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे, वंचित बहुजन आघाडीने त्या प्रमाणातच तिकिटे द्यावीत अशी आग्रही मागणी केली. प्रस्थापित माळी समाजाच्या नेत्यांनी आजपर्यंत माळी समाजासाठी कोणते ठोस कार्य केले नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहीर सचिन माळी यांनी केले. सभेसाठी सातारा, सोलापूर, पुणे, नांदेड , औरंगाबाद, अहमदनगर आदी भागातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अरण येथे आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शीतल साठे यांचा शाहिरी जलशाचा कार्यक्रम उपस्थितांची दाद मिळवून गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केले.

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर