शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
13
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
14
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
15
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
17
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
18
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
19
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
20
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप

भाजप सरकार बिल्डर, इस्टेट वाल्यांचे आहे : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 15:48 IST

माढा तालुक्यातील अरण येथे माळी समाज सत्तासंपादन महामेळावा

ठळक मुद्दे- प्रकाश आंबेडकरांची भाजप सरकारवर जोरदार टिका- माळी समाजाच्या सत्ता संपादन महामेळाव्यात आंबेडकरांची भाजप सरकारवर ताशेरे- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातवरण तापले

अरण: आताच्या सरकारवर कोणाचा विश्वास नाही आणि सरकारचाही कोणावर विश्वास नाही. हे सरकार बिल्डर आणि इस्टेट वाल्यांचं सरकार आहे. ३३००० कुटुंबे देश सोडून गेली आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी केली.

माळी समाज सत्ता संपादन महामेळाव्यात अरण येथे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शंकरराव लिंगे होते. प्रारंभी आंबेडकर यांचा सत्कार महात्मा फुले यांची पगडी घालून आणि संत शिरोमणी सावता महाराजांचे खुरपे देऊन करण्यात आला. सभेला वंचित बहुजन आघाडीचे महासचिव शाहीर सचिन माळी, बाळापूरचे आमदार बळीराम शिरस्कर, सासवड माळी शुगरचे रंजनभाऊ गिरमे, गोपीचंद पडळकर, अ‍ॅड. अशोक ताजने, शिवानंद हैबतपुरे, आण्णाराव पाटील, महिला आघाडी अध्यक्षा किरणताई गिºहे, डॉ. अरुणा माळी, बाबासाहेब माळी, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, आनंद चंदनशिवे, बाळासाहेब माळी, पोपट माळी, सचिन गुलदगड उपस्थित होते. 

यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना शंकरराव लिंगे यांनी माळी समाजाला विधानसभेत लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे, वंचित बहुजन आघाडीने त्या प्रमाणातच तिकिटे द्यावीत अशी आग्रही मागणी केली. प्रस्थापित माळी समाजाच्या नेत्यांनी आजपर्यंत माळी समाजासाठी कोणते ठोस कार्य केले नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहीर सचिन माळी यांनी केले. सभेसाठी सातारा, सोलापूर, पुणे, नांदेड , औरंगाबाद, अहमदनगर आदी भागातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अरण येथे आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शीतल साठे यांचा शाहिरी जलशाचा कार्यक्रम उपस्थितांची दाद मिळवून गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केले.

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर