शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षा हा फक्त धार्मिक मुद्दा नाही

By admin | Updated: July 3, 2017 04:57 IST

गोरक्षा हा केवळ धार्मिक मुद्दा नाही. ज्या राज्यात गायींची संख्या कमी झाली, त्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन नापीक झाली. शेतकऱ्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोरक्षा हा केवळ धार्मिक मुद्दा नाही. ज्या राज्यात गायींची संख्या कमी झाली, त्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन नापीक झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढले. गोरक्ष केवळ धार्मिक मुद्दा नाही, तर त्याला वैज्ञानिक आधारही आहे, याचे भान घटनाकारांना होते, म्हणूनच घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये याचा समावेश करण्यात आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईत षण्मुखानंद सभागृहात जैन इंटरनॅशनल आॅर्गनायजेशन (जिओ)च्या वतीने आयोजित ‘मेगा बिजनेस जिओ कॉन्फरन्स’मध्ये मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी व्यासपीठावर परमपूज्य गणीवर्य नयपद्मसागर महाराज, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, अभिनेता जॅकी श्रॉफ, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, चित्रपट निर्माते आनंद रॉय आदींसह देशाभरात विविध ठिकाणी कार्यरत असणारे जैन बांधव उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘पूज्य नयपद्मसागर महाराज धर्माची सेवा तर करतातच, तसेच सामाजिक कार्यातही ते आघाडीवर असतात. महाराष्ट्रातील १७ हजार खेड्यांमध्ये महाराजांच्या प्रेरणेने जलसिंचनाची कामे सुरू आहेत. जैन समाजाने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, सामाजिक कार्यातही ते पुढे आहेत. जैन धर्माचे विचार त्या समाजातील वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी, सर्व समाजापर्यंत पोहोचविण्याचे उत्कृष्ट काम केले आहे. देशाचा जीडीपी वाढविणारा आणि सर्वाधिक कर भरणारा समाज म्हणूनही जैन समाजाची ओळख आहे.’ नुकताच देशात जीएसटी कायदा लागू झाला असून, त्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले की, ‘एक देश एक कर’ यामुळे विकासाला चालना मिळेल. जीएसटीच्या माध्यमातून मानव विकास निर्देशांक वाढून, रोजगाराच्या संधी निर्माण होतील. युरोपातील विविध देशांमध्ये सीमेवरून झगडा चालू असतो, पण याच युरोपीयन देशांनी आर्थिक आघाडीवर मात्र, एकच बाजारपेठ आणि करप्रणाली लागू केली. सव्वा करोड भारतीयांची ताकद ओळखूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी लागू केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुकीत नयपद्मसागर महाराजांच्या आशीर्वादानेच चमत्कार घडला. प्रामाणिक आणि पारदर्शक कारभारासाठी त्यांचे आशीर्वाद होते. त्यांच्या आशीर्वादाने आमची जबाबदारी वाढली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गायींची कत्तल करणाऱ्यांना आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद असणारा कडक कायदा गुजरात सरकारने केला. गाय आमची माता आहे. दूध उत्पादनात गुजरात देशात सर्वात मोठा करण्याचा प्रयत्न. देशी गायींचे संवर्धन व्हावे, चांगल्या वाणाचे गोधन तयार व्हावे, यासाठी प्रत्येक तालुक्यात नंदीग्राम उभारण्यात येणार असल्याचे, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी सांगितले. गुजरातमध्ये पतंग महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या काळात पक्षी मोठ्या प्रमाणात जखमी होतात. पतंग महोत्सवात पक्षी जखमी होऊ नयेत, यासाठी करुणा अभियान राबविण्यात येत आहे. पक्ष्यांना तत्काळ मदतीसाठी फोनलाइन सेवा सुरू करून उपचार दिले जात असल्याचे रूपानी यांनी सांगितले. तर, जीएसटीमुळे सामान्य माणसाला फायदा होणार असल्याचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले. जीएसटी भरताना, ३६ रिटर्न भरावे लागणार असल्याची तक्रार अनेक जण करतात. प्रत्यक्षात फक्त १२ रिटर्नच भरावे लागणार आहेत. सुरुवातीच्या काळात जीएसटी भरताना अनवधानाने काही चुका झाल्या, तर दुर्लक्ष करण्याचे सरकारचे धोरण आहे, पण जाणूनबुजून चुका केल्या, तर मात्र त्याला शिक्षा होईल. जीएसटी पूर्वीचे कायद्यांमुळे करचोरी करणाऱ्यांची संख्या वाढली होती. जीएसटीमुळे कर भरणाऱ्यांची संख्या वाढेल, त्यासाठीच जीएसटी लागू करण्यात आल्याचे मेघवाल म्हणाले. पुरस्कारांचे वितरण या वेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि रूपानी यांच्या हस्ते ‘जिओ भामाशाह सन्मान’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जिओ भामाशाह पुरस्काराने निर्मल सेठयाजी, अभय श्रीराम, कांतीलाल राम बिहार, नवनीत परिवारचे बाबूलाल बिहार, नरेशभाई, श्रुतीभाई आदींचा सन्मान करण्यात आला. जैन समाजाच्या वतीने महिला साध्वींच्या ‘श्रमणी विहारम’ यासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. जिओ टीमची या वेळी घोषणा करण्यात आली.पतंग महोत्सवात पक्षी जखमी होऊ नयेत, यासाठी करुणा अभियान राबविण्यात येत आहे. पक्ष्यांना तत्काळ मदतीसाठी फोनलाइन सेवा सुरू करून उपचार दिले जात असल्याचे विजय रूपानी यांनी सांगितले.