शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

गोरक्षा हा फक्त धार्मिक मुद्दा नाही

By admin | Updated: July 3, 2017 04:57 IST

गोरक्षा हा केवळ धार्मिक मुद्दा नाही. ज्या राज्यात गायींची संख्या कमी झाली, त्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन नापीक झाली. शेतकऱ्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोरक्षा हा केवळ धार्मिक मुद्दा नाही. ज्या राज्यात गायींची संख्या कमी झाली, त्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन नापीक झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढले. गोरक्ष केवळ धार्मिक मुद्दा नाही, तर त्याला वैज्ञानिक आधारही आहे, याचे भान घटनाकारांना होते, म्हणूनच घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये याचा समावेश करण्यात आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईत षण्मुखानंद सभागृहात जैन इंटरनॅशनल आॅर्गनायजेशन (जिओ)च्या वतीने आयोजित ‘मेगा बिजनेस जिओ कॉन्फरन्स’मध्ये मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी व्यासपीठावर परमपूज्य गणीवर्य नयपद्मसागर महाराज, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, अभिनेता जॅकी श्रॉफ, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, चित्रपट निर्माते आनंद रॉय आदींसह देशाभरात विविध ठिकाणी कार्यरत असणारे जैन बांधव उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘पूज्य नयपद्मसागर महाराज धर्माची सेवा तर करतातच, तसेच सामाजिक कार्यातही ते आघाडीवर असतात. महाराष्ट्रातील १७ हजार खेड्यांमध्ये महाराजांच्या प्रेरणेने जलसिंचनाची कामे सुरू आहेत. जैन समाजाने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, सामाजिक कार्यातही ते पुढे आहेत. जैन धर्माचे विचार त्या समाजातील वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी, सर्व समाजापर्यंत पोहोचविण्याचे उत्कृष्ट काम केले आहे. देशाचा जीडीपी वाढविणारा आणि सर्वाधिक कर भरणारा समाज म्हणूनही जैन समाजाची ओळख आहे.’ नुकताच देशात जीएसटी कायदा लागू झाला असून, त्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले की, ‘एक देश एक कर’ यामुळे विकासाला चालना मिळेल. जीएसटीच्या माध्यमातून मानव विकास निर्देशांक वाढून, रोजगाराच्या संधी निर्माण होतील. युरोपातील विविध देशांमध्ये सीमेवरून झगडा चालू असतो, पण याच युरोपीयन देशांनी आर्थिक आघाडीवर मात्र, एकच बाजारपेठ आणि करप्रणाली लागू केली. सव्वा करोड भारतीयांची ताकद ओळखूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी लागू केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुकीत नयपद्मसागर महाराजांच्या आशीर्वादानेच चमत्कार घडला. प्रामाणिक आणि पारदर्शक कारभारासाठी त्यांचे आशीर्वाद होते. त्यांच्या आशीर्वादाने आमची जबाबदारी वाढली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गायींची कत्तल करणाऱ्यांना आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद असणारा कडक कायदा गुजरात सरकारने केला. गाय आमची माता आहे. दूध उत्पादनात गुजरात देशात सर्वात मोठा करण्याचा प्रयत्न. देशी गायींचे संवर्धन व्हावे, चांगल्या वाणाचे गोधन तयार व्हावे, यासाठी प्रत्येक तालुक्यात नंदीग्राम उभारण्यात येणार असल्याचे, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी सांगितले. गुजरातमध्ये पतंग महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या काळात पक्षी मोठ्या प्रमाणात जखमी होतात. पतंग महोत्सवात पक्षी जखमी होऊ नयेत, यासाठी करुणा अभियान राबविण्यात येत आहे. पक्ष्यांना तत्काळ मदतीसाठी फोनलाइन सेवा सुरू करून उपचार दिले जात असल्याचे रूपानी यांनी सांगितले. तर, जीएसटीमुळे सामान्य माणसाला फायदा होणार असल्याचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले. जीएसटी भरताना, ३६ रिटर्न भरावे लागणार असल्याची तक्रार अनेक जण करतात. प्रत्यक्षात फक्त १२ रिटर्नच भरावे लागणार आहेत. सुरुवातीच्या काळात जीएसटी भरताना अनवधानाने काही चुका झाल्या, तर दुर्लक्ष करण्याचे सरकारचे धोरण आहे, पण जाणूनबुजून चुका केल्या, तर मात्र त्याला शिक्षा होईल. जीएसटी पूर्वीचे कायद्यांमुळे करचोरी करणाऱ्यांची संख्या वाढली होती. जीएसटीमुळे कर भरणाऱ्यांची संख्या वाढेल, त्यासाठीच जीएसटी लागू करण्यात आल्याचे मेघवाल म्हणाले. पुरस्कारांचे वितरण या वेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि रूपानी यांच्या हस्ते ‘जिओ भामाशाह सन्मान’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जिओ भामाशाह पुरस्काराने निर्मल सेठयाजी, अभय श्रीराम, कांतीलाल राम बिहार, नवनीत परिवारचे बाबूलाल बिहार, नरेशभाई, श्रुतीभाई आदींचा सन्मान करण्यात आला. जैन समाजाच्या वतीने महिला साध्वींच्या ‘श्रमणी विहारम’ यासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. जिओ टीमची या वेळी घोषणा करण्यात आली.पतंग महोत्सवात पक्षी जखमी होऊ नयेत, यासाठी करुणा अभियान राबविण्यात येत आहे. पक्ष्यांना तत्काळ मदतीसाठी फोनलाइन सेवा सुरू करून उपचार दिले जात असल्याचे विजय रूपानी यांनी सांगितले.