शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
3
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
4
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
5
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
9
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
10
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
11
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
12
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
13
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
14
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
15
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
16
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
17
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
18
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
19
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
20
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई

सोशल मीडियावर चालवला जातोय 'गो राज्यपाल' हा हॅशटॅग; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा आहे 'आशीर्वाद'  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 7:00 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर 'हे राज्यपाल नकोत' अशी जाहीर भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रपती व पंतप्रधान यांनाही पत्र पाठवून राज्यपालांना परत बोलवा अशी मागणी

पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षाच्या विद्यार्थी संघटनांनी समाजमाध्यमावरून मोहिम सुरू केली आहे. त्यांच्या या मोहिमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या निवडीसंदर्भात राज्यपालांनी घेतलेल्या ठाम भूमिकेवरून हे राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे.  

काँग्रेसच्या एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेने समाजमाध्यमांवरून 'गो राज्यपाल' हा हॅश टॅग चालवला आहे. संघटनेच्या वतीने राष्ट्रपती व पंतप्रधान यांनाही पत्र पाठवून राज्यपालांना परत बोलवा अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाचे संकट वाढत आहे. सरकारने त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याला राज्यपाल विरोध करत आहे.

हे घटनाविरोधी असून राज्यातील तरूणाईला संकटात टाकणारे आहे असे एनएसयूआय चे म्हणणे आहे. राज्य उपाध्यक्ष भूषण रानभेरी याबाबत बोलताना म्हणाले, मंत्री मंडळाने घेतलेल्या निर्णयाला राज्यपाल तेव्हाच विरोध करू शकतात जेव्हा तो घटनेच्या विरोधात असेल. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय तसा नाही. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ते घेण्यात आला आहे. कोरोना अजूनही हद्दपार झालेला नाही. त्याची तीव्रता वाढतेच आहे. अशा स्थितीत  पक्षा घेण्याचा आग्रह धरणे, मंत्री मंडळाला थेट विरोध करणे या गोष्टी अयोग्य आहेत. त्यामुळेच आम्ही गो कोश्यारी अशी मोहिम राबवत आहोत.  

राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भूषण रानभेरी यांनीही अशीच भूमिका मांडली.  राज्यपाल विनाकारण आक्रमक भूमिका घेत आहेत असे ते म्हणाले. मंत्री मंडळाने विचार करूनच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेसाठी गर्दी होणार, त्यातून संसर्ग होणार, तो वाढणार अशा अनेक गोष्टी आहेत. त्यातच तासिका झालेल्या नाहीत, अभ्यासक्रम पुर्ण नाही अशा स्थितीत परीक्षा घेणे योग्य नाही. तरीही राज्यपाल म्हणतात परीक्षा घ्यावी किंवा न घ्यावी हा माझा अधिकार आहे. असे म्हणणे म्हणजे मंत्री मंडळाला विरोध करणेच आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी 'हे राज्यपाल नकोत' अशी जाहीर भूमिका घेतली. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचेही तेच म्हणणे आहे.  

दरम्यान. राज्यपालांना विरोध करण्यासाठी विद्यार्थी संघटनांना चिडवून देण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यपालांना विधानपरिषदेत १२ जागा नियुक्त करण्याचा अधिकार आहे. सरकारने त्यांना यासाठी नावे सुचवायची असतात. कला, साहित्य, विज्ञान, समाजकार्य असे काही निकष त्यासाठी आहेत. ते डावलून प्रत्येक वेळी सरकारकडून राजकीय नियुक्त्या केल्या जातात. विद्यमान राज्यपालांनी असे करण्याला ठाम नकार दिला आहे. १५ जूनला या गटातील विद्यमान २ सदस्यांची मुदत पुर्ण होऊन सर्व म्हणजे १२ जागा रिक्त होत आहेत. त्यावरच्या नेमणूका हेच कारण राज्यपालांना विरोध करण्यामागे असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :Puneपुणेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाState Governmentराज्य सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी