शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

साखर उद्योगाला दहा कोटींचे सॉफ्टलोन तातडीने द्या: अमित शहा यांची घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 21:34 IST

सध्या अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाने हा हंगाम सुरू होण्यापूर्वी या उद्योगास १० हजार कोटी रुपयांचे सॉफ्टलोन द्यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे शुक्रवारी केली. त्यांनी साखर उद्योगाच्या सर्व प्रश्नांची माहिती घेतली असून, त्यावर संबंधित मंत्रिगट समूहासमोर हे प्रश्न मांडून मदत केली जाईल, असे आश्वासन शहा यांनी दिले.

ठळक मुद्देसाखर उद्योगाला दहा कोटींचे सॉफ्टलोन तातडीने द्याभाजपच्या शिष्टमंडळांची मागणी : अमित शहा यांची घेतली भेट

कोल्हापूर : सध्या अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाने हा हंगाम सुरू होण्यापूर्वी या उद्योगास १० हजार कोटी रुपयांचे सॉफ्टलोन द्यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे शुक्रवारी केली. त्यांनी साखर उद्योगाच्या सर्व प्रश्नांची माहिती घेतली असून, त्यावर संबंधित मंत्रिगट समूहासमोर हे प्रश्न मांडून मदत केली जाईल, असे आश्वासन शहा यांनी दिले.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार विनय कोरे, माजी खासदार धनजंय महाडिक, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आदी सहभागी झाले. बैठकीतील चर्चेची माहिती माजी खासदार महाडिक यांनी ह्यलोकमतह्णला दिली. साखर उद्योग गतवर्षी दुष्काळ, त्यानंतर महापूर आणि यावर्षी कोरोनाच्या संकटात सापडला आहे. त्यामुळे एफआरपीपासून कामगारांचे पगार देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नाहीत. त्यासाठी केंद्र शासनाने या उद्योगाला भरीव मदत करण्याची गरज आहे, हे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.

शहा यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. या मागण्यांचे निवेदन केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि रामविलास पासवान यांनाही देणार आहोत. केंद्र सरकारकडून साखर उद्योगांसाठी काही चांगले निर्णय लवकरच घेतले जातील, अशी आशा असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेटीनंतर दिली.

प्रमुख मागण्या अशा

  1. साखर उद्योगाला केंद्र शासनाने आतापर्यंत एफआरपी देण्यासाठी तीन कर्जे दिली आहेत. त्यातील एक फिटले असून, अजून दोन कर्जांचे हप्ते आता सुरू आहेत. या कर्जांची पुर्नरचना केल्यास कर्ज फेडण्यास अवधी मिळेल. शिवाय हप्ते थांबतील व तेवढी रक्कम कारखान्यांनकडे तरलता म्हणून उपलब्ध होईल. त्यासाठी केंद्र शासनाने रिझर्व्ह बँकेस सूचना द्याव्यात.
  2. अडचणीतील उद्योगाल सावरण्यासाठी १० हजार कोटी रुपयांचे नव्याने सॉफ्टलोन द्यावे. ही रक्कम उपलब्ध झाल्यास थकीत एफआरपी, कामगारांचे थकीत पगार देणे शक्य होईल.
  3. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर पॅकेजमध्ये साखर उद्योगाचा समावेश नाही. तो केल्यास लघुउद्योगास जसा वीस टक्के वाटा मिळाला तसाच साखर उद्योगालाही मिळू शकेल.
  4.  केंद्राने पेट्रोलियम कंपन्यांशी बोलून पुढील दहा वर्षांसाठी इथेनॉलचे धोरण निश्चित करावे. या कंपन्यांनी कारखानदारीस इथेनॉल घेण्याची हमी दिल्याशिवाय हा उद्योग वाढीस लागणार नाही आणि बँकांही कर्ज उपलब्ध करून देणार नाहीत. सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल वापरण्यास परवानगी दिली असली तरी सध्या ५ टक्केच वापर सुरू आहे. उसापासून थेट इथेनॉल करायचे झाल्यास त्याबाबतचे धोरण स्पष्ट हवे.

 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAmit Shahअमित शहा