शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

परिवर्तनासाठी भाजपाला बहुमत द्या!

By admin | Updated: October 14, 2014 01:27 IST

महाराष्ट्रात परिवर्तन घडण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासयोजनांचा लाभ होण्यासाठी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत द्या,

उमरखेड (जि. यतवतमाळ) : काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंधरा वर्षांच्या राजवटीत राज्यात कोणाच्याही आयुष्यात परिवर्तन घडले नाही. महाराष्ट्रात परिवर्तन घडण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासयोजनांचा लाभ होण्यासाठी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत द्या, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.
यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड विधानसभा मतदारसंघात महागाव येथे भाजपा उमेदवार राजेंद्र वामन नजरधने यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांच्या काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत महाराष्ट्राला केवळ शेतक:यांच्या आत्महत्या आणि महिलांवर बलात्कार यामध्ये आघाडी मिळाली. 
आघाडी सरकारच्या राजवटीत दीन दलित, आदिवासी, महिला, विद्यार्थी, शेतकरी अशा कोणाच्याही आयुष्यात परिवर्तन घडले नाही. महाराष्ट्रात परिवर्तन होण्यासाठी पंधरा ऑक्टोबरला कमळाचे बटण दाबा आणि भाजपाला स्पष्ट बहुमत द्या.
त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत जनतेने स्पष्ट बहुमताने नरेंद्र मोदी यांचे सरकार निवडून दिले. देशात स्पष्ट बहुमत असलेले कणखर सरकार असल्यावर कसे परिवर्तन होते हे आपण अनुभवतो आहोत. देशात पेट्रोल – डिङोलच्या किंमती कमी झाल्या. देशात गुंतवणूक वाढली, अर्थव्यवस्थेला गती येऊ लागली व त्याबरोबर रोजगारिनर्मिती होण्यास सुरु वात झाली. 
नरेंद्र मोदी यांनी जपान, अमेरिका आदी देशांना भेट दिली. त्याची दखल जगाने घेतली. हा करिष्मा स्पष्ट बहुमत असलेल्या कणखर सरकारचा आहे. राज्यातही परिवर्तन होण्यासाठी संपूर्ण बहुमत असलेले व नरेंद्र मोदी यांच्या हातात हात घालून काम करणारे सरकार हवे आहे. 
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गांधी जयंतीला नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताची घोषणा दिली. त्यानुसार आपण आपले घर, कार्यालय आण िपरिसर स्वच्छ करण्यास मैदानात उतरलो. देश स्वच्छ करायचा असेल तर महाराष्ट्र स्वच्छ करायला हवा.