शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

'सज्जन आता जगणार नाही, दुर्जन आता मरणार...'; जयंत पाटलांनी विधानसभेत महायुती सरकारवर डागले बाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 19:10 IST

अर्थसंकल्पावरील चर्चेत जयंत पाटील सहभागी झाले. यावेळी त्यांनी एक कविता वाचून दाखवत महायुती सरकारवर टीकेचे बाण डागले. 

Jayant Patil News: 'महाराष्ट्र आता थांबणार नाही', या अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडताना म्हटलेल्या ओळीचाच आधार घेत जयंत पाटलांनी सरकारला चिमटे काढले. राज्याची आर्थिक परिस्थिती, वाढलेली गुन्हेगारी, लोकांसाठी आणलेल्या योजनांसाठी तरतूद न केल्याचा मुद्दा अधोरेखित जयंत पाटलांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत सरकारला सुनावले. जयंत पाटलांनी विधानसभेत एक कविता वाचून दाखवत अर्थसंकल्पावर भाष्य केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अर्थसंकल्पावरील चर्चेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले, "अजित पवारांनी कविता दिली. महाराष्ट्र आता थांबवणार नाही, अशी कविता आहे. पण, मीही विचार करायला लागलो की कविता काही सुचतेय का बघावं. शंभूराजे, मी काही कविच्या मार्गावरचा नाहीये. पण, तरी चार ओळी सुचल्या आहेत", असे म्हणत जयंत पाटलांनी कविता वाचून दाखवली. 

जयंत पाटलांनी विधानसभेत म्हटलेली कविता

सज्जन आता जगणार नाही दुर्जन आता मरणार नाही  महाराष्ट्र आता थांबणार नाही

गुन्हेगारी थांबणार नाहीरक्तपात रोखणार नाहीमहाराष्ट्र आता थांबणार नाही

पक्षफोडी करून आम्ही दमणार नाहीजनतेच्या सेवेत आम्ही रमणार नाहीमहाराष्ट्र आता थांबणार नाही

आश्वासने पूर्ण करणार नाही विकासाची वाट धरणार नाहीमहाराष्ट्र आता थांबणार नाही

रोजगार देणार नाहीशिक्षण व आरोग्याची सेवा सुधारणार नाहीमहाराष्ट्र आता थांबणार नाही

अजितदादांनी तुकोबांना दूर केलंय

कविता वाचल्यानंतर जयंत पाटील म्हणाले, "मागच्या भाषणात अजितदादांनी तुकाराम महाराजांचे अभंग म्हटले होते. पण, यावेळी तुकोबांना दादांनी दूर केलं आहे. आणि प्रश्न असा आहे की, का अजितदादा तुकोबांपासून दूर गेले? हरकत नाही. पण, तुकोबांबरोबर आता एकनाथांनाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे", असा टोला जयंत पाटलांनी अजित पवारांना लगावला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुती