शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कमी खर्चात वांग्यातून लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 11:42 IST

यशकथा : या ७ गुंठ्यांतील वांग्यातून त्यांना एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात तीस हजार रु पये खर्च वजा जाता ७० हजार रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. 

- रोहन वावधाने (मानोरी, जि.नाशिक)

सध्या शेतकरी सर्वच बाजूने उदासीन झाला असून, घाम गाळून पिकविलेल्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने केलेला खर्चही भरून निघणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत मानोरी बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी बाबासाहेब बोराडे यांनी पारंपरिक पद्धतीच्या शेतीला फाटा देत आपल्या ७ गुंठे शेतात अजय अंकुर वांग्याची लागवड केली आहे. या ७ गुंठ्यांतील वांग्यातून त्यांना एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात तीस हजार रु पये खर्च वजा जाता ७० हजार रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. 

वांगे पिकाची यशस्वी लागवड करून शेतकऱ्यांसमोर त्यांनी नवा आदर्श उभा केला आहे. बाबासाहेब बोराडे यांनी सुरुवातीला ७ गुंठ्यांत ५ बाय ७ अंतरावर बैलजोडीच्या साहाय्याने सरी पाडल्या. त्यावर मल्चिंग पेपरचे आच्छादन करून त्यात प्रत्येकी ५ फुटांच्या अंतरावर वांग्याची रोपे लावली. नोव्हेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ पर्यंत विहिरीत मुबलक पाणी साठा असल्याने वेळेवर पिकाला पाणी दिले. त्यामुळे झाडे नेहमी हिरवीगार राहत होती. फेब्रुवारीनंतर मात्र पाण्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाल्याने बोराडे यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून वांग्याची झाडे जगवली.

वातावरणात बदल झाल्यास किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने बुरशीनाशक, पोषक, काईट, नोवान, क्लोरो कीटकनाशकांची वेळोवेळी फवारणी केली, त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी झाला. येवला, मुखेड, जळगाव नेऊर, देवगाव, देशमाने, लासलगाव आदी गावांतील आठवडी बाजारात जाऊन बाबासाहेब बोराडे ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने हात विक्री करतात. यापुढे सुमारे दोन महिने वांग्याचे उत्पादन मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. त्यातून त्यांना २५ हजार रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. इतर शेतकऱ्यांनीही अशा नव्या पीकपद्धतीच्या अवलंब करून कमी क्षेत्रात, कमी खर्चात जास्त उत्पादन मिळणाऱ्या भाजीपाल्याची लागवड केल्यास शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळू शकते, असे बोराडे सांगतात.

व्यापारी शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाहीत म्हणून ओरड करण्यापेक्षा आपल्या पिकासाठी आपणच बाजारपेठ निर्माण केल्यास त्याचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होऊ शकतो हे बोराडे यांच्या प्रयत्नातून दिसून येते. वांगे तोडून ते थेट आठवडी बाजारात नेणे आणि स्वत:च त्याची विक्री केल्याने बाजाराचा नेमका कलही त्यांना समजला. येवला तालुक्यात बहुसंख्य शेतकऱ्यांचा कल कांदा पिकाकडे असतो, कांद्याला हजार रुपये क्विंटल भाव मिळाला तरी परवडते, असे शेतकरी म्हणतात. कांद्यापेक्षा इतर पिकातही चांगला पैसा मिळू शकतो, हेच या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. वर्षानुवर्षे पारंपरिक पीक करण्यापेक्षा वेगळा प्रयोग करण्यास काय हरकत आहे? आपण पिकवलेला माल आपणच विकला तर जास्तीचे पैसे मिळतील.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र