शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
5
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
6
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
7
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
8
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
9
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
10
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
11
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
12
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
13
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
14
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
15
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
16
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
17
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
18
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
19
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
20
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप

हजारो कोटींचा निधी, रेल्वे अधिकारी वेगळ्याच तोऱ्यात; प्रवाशांचे जीव राम भरोसे

By नरेश डोंगरे | Updated: October 23, 2024 00:07 IST

नागपूर हे देशाचे हृदयस्थळ असून, येथे रेल्वेची मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वे अशी दोन विभागीय कार्यालये आहेत. यातील दपूम रेल्वेच्या अधिकाऱ्यांची कार्यशैली सातत्याने चर्चेचा विषय ठरते.

नरेश डोंगरे

नागपूर : महाराष्ट्रासह देशभरातील वेगवेगळ्या रेल्वे रूटवर हजारो कोटींच्या विकासकामांची गाडी वायुवेगाने धावत असल्याचा सर्वत्र बोलबाला आहे. असे असताना कधी या तर कधी त्या प्रांतात रेल्वे गाड्यांचे अपघात होत आहेत. अपघातासारखा गंभीर प्रकार घडूनही रेल्वे अधिकारी मात्र आपल्याच तोऱ्यात वागत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे जीव भगवान भरोसे झाल्याची संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.

आसाममधील बालासोरमध्ये २ जून २०२३ला रेल्वेचा भीषण अपघात झाला. ज्यात २७८ जणांना जीव गमवावा लागला. शंभरावर जणांना अपंगत्व आले तर, शेकडो जण गंभीर जखमी झाले. या अपघाताने रेल्वे प्रशासनाचा कारभार चर्चेचाच नव्हे तर चिंतेचाही विषय ठरला होता. सडकून टीका झाल्यानंतर जागोजागच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर विकासकामांची यादी वाचणे सुरू केले. प्रसिद्धीसाठी पीआरओच्या माध्यमातून रोजच प्रसारमाध्यमांना पाठविणे सुरू केले. त्या माध्यमातून हजारो कोटींच्या विकासकामांचा बोलबाला केला जात असताना रेल्वेच्या भयावह अपघाताबाबत काही अधिकारी बोलण्याचे टाळतात आहे.

आज नागपुरात शालीमार एक्स्प्रेसचे डबे रुळावर घसरले (डीरेल) अन् एक भयावह अपघात होता होता थोडक्यात वाचला. गेल्या तीन-चार महिन्यांच्या डिरेलमेंटच्या घटनांचा विचार केल्यास, जून महिन्यात कांचनजंगा एक्स्प्रेसला पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात घडला. काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वेस्थानकावर लोकल डी रेलमेंट झाली. आसाममध्ये आगरतला एलटीटी एक्स्प्रेसचे डबे डिबालोंग स्थानकावर घसरले. यूपीत चंदीगड एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले. जुलै महिन्यातच झारखंडच्या बाराबम्बो रेल्वे स्टेशनजवळ हावडा मुंबई मेलचे १८ डबे पटरीवरून घसरले आणि उत्तर प्रदेशच्याच मथुरेत मालगाडीचे सुमारे २५ डबे घसरले. प्रवाशांना आरामदायक आणि गतिमान प्रवासाची अनुभूती देण्यासाठी हजारो कोटींची रेल्वेची विकासकामे सुरू असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात व्हावे, हा प्रकार अस्वस्थ करणारा ठरतो. यातून रेल्वे प्रवाशांचा जीव भगवान भरोसे आहे का, असाही चिंतायुक्त प्रश्न उपस्थित झाला आहे.

अधिकारी व्यस्त आहेत!

विशेष म्हणजे, नागपूर हे देशाचे हृदयस्थळ असून, येथे रेल्वेची मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वे अशी दोन विभागीय कार्यालये आहेत. यातील दपूम रेल्वेच्या अधिकाऱ्यांची कार्यशैली सातत्याने चर्चेचा विषय ठरते. खास करून शीर्षस्थ अधिकारी एवढे व्यस्त असतात की त्यांना सामान्य सोडा पत्रकारांशी भेटण्या-बोलण्यासाठी वेळ मिळत नाही. मंगळवारी येथे शालीमार एक्स्प्रेसचे डबे घसरून एक भयंकर अपघात होता होता थोडक्यात वाचला. त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकारांना भेटण्याचे सोडा फोनवर बोलण्याचेही साैजन्य दाखविले नाही. प्रस्तुत प्रतिनिधीने माहितीसाठी विभागीय व्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांना वारंवार फोन केले. मात्र, त्यांनी रात्री ९:३० पर्यंत फोनच उचलला नाही तर वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांनी मला वेळ नाही, म्हणत बोलण्याचे टाळले.

नागभीड चांदा मार्गावरचे प्रकरण

आजच्या शालीमार एक्स्प्रेसच्या अपघाताचे नव्हे तर जून महिन्यात दुसऱ्या एका अशाच अपघात प्रकरणातही अधिकाऱ्यांची भूमिका अशीच होती. दपूम रेल्वेच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या नागभीड चांदा फोर्ट मार्गावर एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे भीषण अपघात होणार होता. ऐनवेळी लोको पायलटने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तो अपघात टळला. या गंभीर प्रकरणाने नागपूर ते दिल्लीपर्यंत खळबळ निर्माण केली होती. मात्र, हे प्रकरण प्रसारमाध्यमात येऊ नये म्हणून दपूमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मोठी धडपड केली होती.

टॅग्स :railwayरेल्वे