शहरं
Join us  
Trending Stories
1
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
2
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
3
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
4
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
5
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
6
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
7
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
9
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
10
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
11
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
12
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
13
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
14
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
15
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
16
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
17
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
18
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
19
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

Mango growers march: मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच - राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 13:21 IST

राज्यातील शेतकरी कोकणाच्या पाठीशी

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे यंदा कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आंबा बागायतदारांना हेक्टरी पाच लाख आणि काजू बागायतदारांना हेक्टरी तीन लाख रुपये इतकी नुकसानभरपाई दिली जावी, या मागणीसाठी शुक्रवारी(दि. १५ मे) दुपारी साडेतीन वाजता गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा नेणारच असल्याचा ठाम निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

या पत्रकार उद्धवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बुधवारी चर्चा झाल्याने आणि त्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा निघणार की नाही, असा प्रश्न होता. मात्र, आता मोर्चा अडवायला जनरल डायर आले तरी मोर्चा निघणारच, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

कोकणातील शेतकरी कधीही आक्रमक होत नाहीत. हा त्यांचा दोष नाही. आतापर्यंत कोकणानेच सर्व महाराष्ट्राला प्रेरणा दिली आहे. स्वातंत्र्य लढ्याची चळवळही कोकणातूनच सुरू झाली होती. आता महाराष्ट्रातील सर्व शेतकरी कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे ठाकले आहेत. कोकणातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी हा मोर्चा होणारच असल्याचे त्यांनी सांगितले.

आंबा, काजूचे नेमके किती नुकसान झाले आहे, याचे सर्वेक्षणच झालेले नाही. महसूल मंत्र्यांच्या बैठकीतच ही बाब पुढे आली. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण पूर्ण होण्यासाठी अजून १० दिवस लागतील, असे सांगितले आहे. महसूल खाते झोपून राहिले होते. आता सर्वेक्षण कधी होणार, असा प्रश्न विनायक राऊत यांनी केला.

कॅबिनेट मंत्र्यांच्या तोंडाला पट्टी

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीनही जिल्ह्यांत कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र, वरिष्ठांना खूश करण्यासाठी हे कॅबिनेट मंत्री तोंडाला पट्टी लावून बसले आहेत, असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला.

रोजगारासाठी दावोस कशाला

रोजगार आणण्यासाठी दावोसला जाण्याची गरजच नाही. कोकणात दीड कोटी आंब्याची आणि तीन कोटी काजूची झाडे आहेत. यावर आधारित खूप मोठा व्यवसाय आहे. मात्र, त्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Mango Growers to March on CM's Bungalow: Raju Shetti

Web Summary : Mango and cashew farmers, facing losses due to climate change, will march to the CM's bungalow demanding compensation. Raju Shetti insists the protest will proceed despite assurances from ministers, highlighting government neglect of Konkan farmers.