शिर्डी, नाशिक, कोल्हापुरचे ‘उड्डाण’ उंचच उंच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 07:00 AM2019-11-03T07:00:00+5:302019-11-03T07:00:02+5:30

नाशिक, नांदेड, जळगाव, नागपुर विमानतळांवरील प्रवाशांची ये-जाही वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे..

The 'flight' of Shirdi, Nashik, Kolhapur is high | शिर्डी, नाशिक, कोल्हापुरचे ‘उड्डाण’ उंचच उंच

शिर्डी, नाशिक, कोल्हापुरचे ‘उड्डाण’ उंचच उंच

googlenewsNext
ठळक मुद्देमागील वर्षी एप्रिल ते सप्टेबर या कालावधी शिर्डी विमानतळावरून विमानांच्या ८०२ फेऱ्या 

पुणे : राज्यात काही वर्षांपुर्वीच सुरू झालेल्या शिर्डी, कोल्हापुर, नाशिक विमानतळांवरून उड्डाण होणाऱ्या विमानांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे या विमानतळांवरून देशांतर्गत ये-जा करणाऱ्या प्रवाशांची उड्डाणे उंचच उंच होऊ लागली आहेत. प्रामुख्याने शिर्डी व कोल्हापुर विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत अनुक्रमे ७ व ४२ पटींनी वाढ झाली आहे. नाशिक, नांदेड, जळगाव, नागपुर विमानतळांवरील प्रवाशांची ये-जाही वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणा (एएआय) ने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतील अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राज्यात सर्वाधिक प्रवाशांची ये-जा मुंबई व पुणे विमानतळावरून होते. त्याखालोखाल नागपुर व औरंगाबाद विमानतळांचा क्रमांक लागतो. अहवालातील आकडेवारीनुसार, यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत मुंबई, पुणे व औरंगाबाद विमानतळांवरील प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येते. ही घट मागील वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे ५.८, १०.१ व ४०.९ टक्के एवढी आहे. एकीकडे या मोठ्या विमानतळांकडे प्रवाशांकडून पाठ फिरविली जात असताना इतर विमानतळांवरील प्रवाशांच्या प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. 
मागील वर्षी एप्रिल ते सप्टेबर या कालावधी शिर्डी विमानतळावरून विमानांच्या ८०२ फेऱ्या झाल्या. त्याद्वारे ३९ हजार ८९८ प्रवाशांनी प्रवास केला. यावर्षी याच कालावधीत तब्बल २ लाख ९३ हजार प्रवाशांनी ये-जा केली. या काळात विमानांच्या ३ हजारांहून अधिक फेऱ्या झाल्या. कोल्हापुर विमानतळावरून विमान फेऱ्यामध्ये ११२ वरून १३२४ पर्यंत वाढ झाली आहे. तर प्रवासी संख्येचा आकडा १४३३ वरून तब्बल ६१ हजारांपर्यंत वाढला आहे. नाशिक विमानतळही यामध्ये मागे राहिलेले नाही. नाशिकमधील प्रवाशांची संख्या १२६२० वरून ४६७५६ पर्यंत वाढल्याचे दिसते. तर विमानांच्या फेऱ्या ३४६ वरून १०१४ पर्यंत वाढल्या आहेत. नागपुर, नांदेड, जळगाव विमानतळांवरून विमनांची उ्डाणे वाढू लागल्याने प्रवासी संख्येतही वाढ होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.
..........
शिर्डी, नाशिक व कोल्हापुरमध्ये विमानतळ सुरू होण्यापुर्वी या भागातील प्रवाशांना पुण्यात यावे लागत होते. शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा ओघ मोठा असतो. पुर्वी पुण्यात विमानाने येऊन रस्त्याने शिर्डीपर्यंत जावे लागत होते. नाशिक व कोल्हापुरच्या बाबतीतही हीच स्थिती होती. पण विमानतळावरून उड्डाणे सुरू झाल्यानंतर हे चित्र बदलू लागले आहे. देशातील विविध शहरांना विमानसेवेद्वारे या शहरांना जोडण्यात आले आहे. त्यामुळे थेट या शहरांमध्ये ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या वाढली आहे.
 
---------------------
राज्यातील विमानतळांवरील देशांतर्गत प्रवासी वाहतुक (एप्रिल ते सप्टेंबर)
                           प्रवासी संख्या                       विमानांची ये-जा
विमानतळ          २०१८        २०१९                     २०१८                 २०१९
मुंबई        १,७७,६६,९९६    १,६७,३४,२९५          १,१९,९०६          १,१३,५२४
नागपूर        १२,६५,८२६    १४,८१,१३२             १०,२८४               ११,१८९
पुणे            ४४,४४,०९८    ३९,९६,५७८               २९,६२२              २६,५६४
औरंगाबाद    १,७०,१२८    १,००,५१४                  १,८५०                १,०६४
जुहू               ७२,६६१        ७८,०८४                  १०,१२३              १०,८७२
कोल्हापुर      १,४३३        ६१,०८९                       ११२                 १,३२४
जळगाव        १,४९९        २,६७४                       १९४                   १०४
शिर्डी            ३९,८९८        २,९३,३०१                 ८०२                  ३,१७२
नांदेड            ५३,३७०        ६७,०६९                  ८४८                  १,१०३
नाशिक        १२,६२०        ४६,७५६                   ३४६             १,०१४        

Web Title: The 'flight' of Shirdi, Nashik, Kolhapur is high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.