शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

आठ नव्या जिल्ह्यांसाठी लागतील ५ हजार कोटी!

By admin | Updated: June 17, 2014 09:30 IST

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्हानिर्मितीची घोषणा होताच जिल्ह्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आठ तालुक्यांनी आपली मागणी पुढे रेटली आहे.

अतुल कुलकर्णी, मुंबईठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्हानिर्मितीची घोषणा होताच जिल्ह्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आठ तालुक्यांनी आपली मागणी पुढे रेटली आहे. जनमताचा रेटा लक्षात घेऊन शासनाने जर आठ नवे जिल्हे करण्याचा निर्णय घेतला तर तिजोरीवर पहिल्या झटक्यात किमान ५ हजार कोटींचा बोजा पडेल. शिवाय, दरवर्षी पगार आणि अन्य प्रशासकीय गोष्टींवर १२०० कोटी खर्चाचे मीटर सुरू होईल.पालघर जिल्हानिर्मितीमुळे इतर ठिकाणांंहूनदेखील जिल्हा विभाजनाच्या मागण्या पुढे येत आहेत. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकीय नेत्यांनाही जिल्हा विभाजनाचे वेध लागले आहेत. मात्र, अशी जिल्हानिर्मिती करताना राजकीय सोयीपेक्षा पाण्यापासून रोजगारापर्यंतची गरज आणि क्षमता लक्षात घेऊन जिल्हानिर्मिती  व्हायला हवी पण आपल्याकडे आजपर्यंत ज्या जिल्ह्णाचे नेते जास्त आग्रही तेवढी जिल्हा निर्मिती लवकर झाल्याचे चित्र आहे. राजकारणापेक्षा भौगोलिक क्षेत्र आणि नैसर्गिक संपदा यांचा विचार करुन काही जिल्ह्णांची पुर्नरचना देखील करायला हवी, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.पालघर जिल्हा करताना आवर्ती खर्चापोटी १४८.३६ कोटी रुपये लागले. यापुढे हा खर्च दरवर्षी करावा लागणार आहे. ज्यात पगार, प्रशासकीय खर्चाचा समावेश आहे. तर अनावर्ती खर्चापोटी २५० कोटी रुपये लागणार आहेत. त्यातून प्रशासकीय इमारती, घरे, विश्रामगृहे अशा गोष्टी बांधल्या जाणार आहेत. शिवाय फर्निचरसारख्या गोष्टींसाठी ६७.५३ कोटी रुपये लागणार आहेत. याबाबत महसूल विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय म्हणाले, पालघरमध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारी जमिनी आहेत. त्यामुळे तेथे फक्त बांधकामासाठीच पैसे लागतील. मात्र अन्य ठिकाणी जर जिल्ह्णांची मागणी येत असेल आणि तेथे जर सरकारच्या मालकीच्या जमिनी उपलब्ध नसतील तर हा खर्च आणखी वाढू शकतो.केंद्र सरकारने जमीन संपादन करण्यासाठीच्या कायद्यात बदल केला. खाजगी जमिनी घेताना औरंगाबादेत एमआयडीसीने प्रती एकर २० लाखाच्या आसपास रक्कम सरकारने मोजली. याच पध्दतीने एकरी एवढी मोठी रक्कम द्यावी लागणार असेल तर हा खर्च कितीतरी जास्त होईल. एकट्या पालघरला शासकीय जमीन असताना आजमितीला ४६५.८९ कोटी रुपये खर्च आला आहे. याच दराने आठ जिल्ह्णासाठी तो किमान ५ हजार कोटींच्या घरात जाईल. शिवाय आजच राज्यात किमान ५० आयएएस अधिकाऱ्यांची कमतरता आहे. आठ जिल्हे वाढले तर आयएएस अधिकाऱ्यांची संख्या आणखी वाढेल.या जिल्ह्णांची आहे मागणीकाटोल (नागपूर), सातारामधून कराड, बुलढाण्यातून खामगाव, नांदेडमधून किनवट, पुण्यापासून बारामती, यवतमाळपासून पुसद तर लातूरपासून उदगीर तालुक्यांनी फारकतीच्या मागण्या केल्या आहेत. अहमदनगर जिल्हा देखील उत्तर आणि दक्षिण अशा दोन जिल्ह्णात विभागला जावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.