शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 6:18 AM

ठाकरे सरकारचे गिफ्ट : कामकाजाची वेळ वाढविली

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारच्या १८ लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांना २९ फेब्रुवारीपासून आठवड्यात पाच दिवसच काम करावे लागेल. मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय घेताना रोजच्या कामकाजाची वेळ पाऊण तासाने वाढविण्याचे ठरविले.

मात्र, ज्या सरकारी कार्यालयांना कारखाना कायदा किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक आहेत, त्या कार्यालयांना व सरकारी महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार नाही. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाºयांसोबत गेल्याच आठवड्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच दिवसांच्या आठवड्याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले होते आणि आता निर्णयही घेतला.

शनिवार व रविवार मिळून कर्मचाºयांना १०४ दिवस सुट्टी असेल. सार्वजनिक सुट्ट्या सुमारे २० असतात.आतापर्यंत राज्य कर्मचाºयांना दुसºया व चवथ्या शनिवारी सुट्टी असायची, आता महिन्यातील सर्व शनिवार, रविवारी सुट्टी असेल. या निर्णयामुळे अधिकारी आणि कर्मचाºयांच्या संघटनांची एक महत्त्वाची मागणी पूर्ण झाली. आता सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याची कर्मचाºयांची मागणी आहे. केंद्र सरकार, तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, गोवा, बिहार, तमिळनाडू व पश्चिम बंगाल या राज्यांत पाच दिवसांचा आठवडा आहे. राज्यात एमएमआरडीए व एमआयडीसी कार्यालयात आधीपासूनच पाच दिवसांचा आठवडा आहे.

या निर्णयाचा फायदा कर्मचाºयांना तर होईलच, पण आठवड्यातून पाच दिवसच सरकारचे कामकाज चालणार असल्याने सरकारचा आस्थापना, तसेच वीज, पाणी, शासकीय गाड्यांचे इंधन या सर्वांवरील खर्च कमी होणार आहे.अशी असेल कामकाजाची वेळया कर्मचाºयांची मुंबईत कामकाजाची वेळ सध्या सकाळी ९.४५ ते ५.३० तर अन्यत्र सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ ही आहे. आता राज्यभर सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ हीच कामकाजाची वेळ असेल. भोजनाची वेळ अर्धा तास असेल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMantralayaमंत्रालयGovernmentसरकार