शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

पानशेत भरले, मुठेला पुन्हा पूर

By admin | Updated: August 6, 2016 00:25 IST

पानशेत धरण गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच भरले असून, धरणातून सायंकाळी सात वाजता ९ हजार ५०० क्युसेक्स पाणी खडकवासला धरणात सोडण्यास सुरुवात करण्यात आली

पुणे : खडकवासला धरणसाखळीमधील पानशेत धरण गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच भरले असून, धरणातून सायंकाळी सात वाजता ९ हजार ५०० क्युसेक्स पाणी खडकवासला धरणात सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार सुरू असल्याने तब्बल ४१ हजार ७५६ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे महापालिकेसमोरील टिळक पुलाला पाणी टेकले आहे. नदीकाठावरील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले आहे. शुुक्रवारी सकाळीच पानशेत धरणाचा पाणीसाठा ९६ टक्क्यांच्या पुढे गेल्याने सायंकाळी पाणी सोडण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पाटबंधारे विभागाकडून खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग वाढविला. रात्री ८ च्या सुमारास हा विसर्ग ४५ हजार क्युसेक्स करण्यात आला होता. यामुळे अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. रात्री पाऊस कमी झाल्याने अकरा वाजल्यापासून हा विसर्ग ४० हजार इतका सुरू ठेवण्यात आला आहे. मात्र, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पाऊस कायम राहिल्यास विसर्ग वाढवावा लागणार आहे. त्यामुळे पुणे शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर पाऊस सुरूच असल्याने सायंकाळी ५ वाजता हा पाणीसाठा २५.१६ टीएमसी (८६ टक्के ) झाला आहे.(प्रतिनिधी)>नदीच्या पात्रातील पाणी वाढत असल्याने नदीकाठाच्या अनेक कुटुंबांनी रात्र जागून काढली. नदीपासून थोडेसे दूर असलेल्या नागरिकांनाही पाणी आपल्या घरात शिरेल काय याची भीती सतावत होती. महापालिकेच्या आत्पकालीन निवारण कक्ष तसेच अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास फोन करून सातत्याने पाणी कधी कमी होणार याची नदीकाठच्या लोकांकडून विचारणा करण्यात येत होती. पाटील इस्टेट झोपडपटटीमधील नदीकाठच्या १५० घरांमध्ये रात्री उशीरा पाणी शिरले. त्या कुटुंबांना पालिकेच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार गुरुवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळपासून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अवघ्या १२ तासांत पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तिन्ही धरणांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ६ ते सायंकाळी ५ या कालावधीत खडकवासला ५३ मिमी, पानशेत ११५ मिमी, वरसगाव ११४ मिमी तर टेमघर धरणात ९२ मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे पाणी सोडण्यात आल्यानंतरही पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचे चित्र होते.‘खडकवासल्या’तून ४२ हजार क्युसेक्स विसर्गपानशेत धरणातून सायंकाळी पाणी सोडण्यात येणार असल्याने पाटबंधारे विभागाकडून सकाळपासूनच खबरदारीचा उपाय म्हणून खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. तो सकाळी १० पासून ४ हजारांवरून १० हजार क्युसेक्स करण्यात आला. तर, दुपारी २ वाजता २० हजार क्युसेक्स करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता तो तब्बल ३५ हजार करण्यात आला. दरम्यान, रात्री ४२ हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. तसेच रात्री अकरा वाजल्यानंतर विसर्ग ४० हजार क्युसेक्सपर्यंत करण्यात आला. दिवसभर पाणी सोडण्यात आल्यानंतर सायंकाळीही धरणात जवळपास तेवढाच पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.>पानशेत भरले : शहर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवार (दि.१)पासून सुरू झालेल्या पावसाने खडकवासला धरणसाखळीमधील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चारही धरणांमध्ये चांगला पाणीसाठा वाढला आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी पानशेत धरण हे ६५ टक्के भरलेले होते. या धरणाची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता सुमारे १०.६५ टीएमसी असून, आज सकाळी धरणात ९.७७ टीएमसी पाणी जमा झाले होते (९२ टक्के). त्यानंतर सायंकाळी हा पाणीसाठा १० टीएमसीच्या वर गेल्याने रात्री पावसाची शक्यता लक्षात घेऊन धरणातून सायंकाळी सातनंतर सुमारे ९ हजार ५०० क्युसेक्स पाणी खडकवासला धरणात सोडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, वीजनिर्मिती केंद्रासाठीसुद्धा ६०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. दोन वर्षांत पानशेत धरण पहिल्यांदाच भरले आहे.