शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळेबाजांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार

By admin | Updated: July 31, 2014 04:13 IST

काँगे्रस-राष्ट्रवादी सरकारने १५ वर्षे फक्त लुटण्याचे काम केले आहे

नवी मुंबई : काँगे्रस-राष्ट्रवादी सरकारने १५ वर्षे फक्त लुटण्याचे काम केले आहे. या निवडणुकीमध्ये परिवर्तन अटळ असून महायुतीची सत्ता आल्यानंतर घोटाळेबाजांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे मत भाजपा प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या वेळी फडणवीस यांनी आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविली. सत्ताधाऱ्यांनी राज्याचा सत्यानाश केला आहे. आघाडीच्या काळात फक्त नेते मोठे झाले, जनतेच्या वाट्याला मात्र उपेक्षाच आली. दहशतवादी हल्ल्याला ६ वर्षे झाली तरी मुंबईत सीसी टीव्ही लावण्यात आलेले नाहीत. या घोटाळेबाजांना किती दिवस सहन करणार? येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. महायुतीचे सरकार आले की सर्व घोटाळेबाजांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. नवी मुंबई स्वत:च्या बापाची समजून येथील सत्ताधारी कारभार करीत आहेत. त्यांचे कंबरडे या निवडणुकीत मोडले जाईल, असेही ते म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही सरकारवर टीका केली. या सरकारने काहीच कामे न करता राज्यावर ३ लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. नवी मुंबईतील सत्ताधाऱ्यांना स्वत:साठी व्हाइट हाऊस बांधायला वेळ आहे, पण अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक बांधता आले नसल्याची टीकाही केली. मेळाव्याचे आयोजक व माजी आमदार मंदा म्हात्रे यांनीही पालकमंत्री गणेश नाईक यांच्या कारभारावर टीका केली. २० वर्षे राष्ट्रवादीत काम केले, परंतु येथील नेतृत्वाने सातत्याने दुय्यम वागणूक दिल्याची टीका केली. सत्ताधाऱ्यांनी एफएसआय व विकासाचे फक्त राजकारण केल्याचे मतही व्यक्त केले. या वेळी माजी आमदार संजय केळकर, विजय चौगुले, वैभव नाईक, विठ्ठल मोरे, सिद्राम होवाळ, विजया घरत व इतर मान्यवर उपस्थित होते.