शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

अजित पवारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; मनसे नेते प्रकाश महाजन संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 12:58 IST

अकोला इथं अमोल मिटकरींची गाडी फोडल्यानंतर मनसे-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी अजित पवारांवर घणाघात केला आहे.

छत्रपती संभाजीनगर - अमोल मिटकरींनी तोंडाला संयम ठेवावा असं अजित पवारांनी मागे सांगितले होते. त्यांनी संयम सोडला त्यामुळे आमच्या तरूण कार्यकर्त्याचा नाहक बळी गेला. साधी गाडी फोडली तर उमेश पाटील म्हणतात, राज ठाकरेंना अटक करा, खटला भरा, मग एखादा मृत्यू झाला तर यांच्या नेत्यांना जबाबदार धरलं पाहिजे. त्यामुळे अजित पवारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ही मागणी करतोय असं सांगत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी संतप्त भूमिका मांडली आहे.

प्रकाश महाजन म्हणाले की, २ दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी पुण्याच्या पूरपरिस्थितीवर विधान केले. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी माझे नेते राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हटलं. एका वैधानिक पदावर अमोल मिटकरी आहेत त्यांच्याकडे असा कुठला पुरावा आहे की राज ठाकरेंनी सुपारी घेतली. बेछूट आरोप करणं ही मिटकरींची सवय आहे. अनेकदा भाजपा नेत्यांवरही ते बोलतात. राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांनी ब्राह्मण समाजावर अत्यंत घाणेरडे अनोद्गार काढलेले आहेत. त्या रागातून त्यांना जाब विचारण्यासाठी मनसे कार्यकर्ते गेले तिथे बाचाबाची झाली त्याचं रुपांतर गाडी फोडली. पण या सगळ्या गोष्टीचा तणाव येऊन आमचा तरुण कार्यकर्ता गेला. अमोल मिटकरी, उमेश पाटील आणि अजित पवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली. 

तसेच टीका करताना शाब्दिक शब्द काय वापरतो हेदेखील महत्त्वाचं आहे. राज ठाकरेंसारख्या नेत्याला सुपारीबाज म्हणता, तुमच्याकडे असा कुठला पुरावा आहे. मिटकरींनी आजपर्यंत तो पुरावा दिला का? सुपारीबाज तर अजित पवार आहेत, जरांडेश्वर कारखाना त्यांनी कशारितीने हडपला. खुद्द पंतप्रधानांनी ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं. आम्ही कधी अजित पवारांवर मर्यादा सोडून आरोप केलेत का? या राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंसाठी मनसे कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केले. कोकणातील आमचे वैभव खेडेकर यांचा विरोध होता. त्यावेळी तुम्ही राज ठाकरेंना मनवलं, मनापासून तुमचा प्रचार मनसे कार्यकर्त्यांनी केला. जर हा प्रचार केला नसता तर रायगडचं चित्र वेगळं दिसलं असतं. त्यावेळी तुम्हाला राज ठाकरे सुपारीबाज दिसले नाहीत, कारण तुमचा फायदा होता. बारामतीत आमच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार केला. तेव्हा तुम्हाला आठवलं नाही का असा सवालही प्रकाश महाजन यांनी राष्ट्रवादीला विचारला. 

दरम्यान, ज्या भाजपासोबत अजित पवार आहेत त्यांनी गाडीभर पुरावे त्यांच्याविरोधात नेले होते. अजित पवारांवर आम्ही आरोप केले नव्हते. आम्ही मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून महायुतीला पाठिंबा दिला होता. अजित पवारांना महायुतीत राहायचं नाही त्यामुळे काही ना काही करून भांडणं करतायेत. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांचे राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत हे त्यांना कुठेतरी खटकतंय. राज ठाकरे महायुतीत भिडू म्हणून आले तर आपलं कसं, त्यामुळे महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अमोल मिटकरींच्या सडक्या डोक्यातून निघालेली ही कल्पना आहे असा आरोपही मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला.

 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती