शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

शाळांच्या नुकसानीची माहिती देण्यासाठी दिले काही तास, पुरग्रस्तानंतर आता शाळांची सरकारकडून थट्टा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 05:25 IST

राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे अनेक जिल्हे सध्या पाण्याखाली आहेत. मुंबई आणि परिसरातही काही दिवसांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.

मुंबई: राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे अनेक जिल्हे सध्या पाण्याखाली आहेत. मुंबई आणि परिसरातही काही दिवसांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शाळांचे नुकसान झाले असण्याची शक्यता असून सदर नुकसानाची माहिती शिक्षण निरीक्षकांनी मुखाध्यापकांकडून मागवली आहे.विशेष म्हणजे शनिवारी या संबंधित परिपत्रक काढले असून मुख्याध्यापकांना संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ही माहिती वॉर्ड अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना दिले असल्याने मुख्याध्यापकच गोंधळल्याची परिस्थिती निर्माण झाली.मागच्याच आठवड्यात राज्यातील इतर भागांप्रमाणे मुंबईतही अतिवृष्टी झाल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पावसाचा जोर इतका जास्त होता की यामध्ये काही शाळांचे नुकसान झाल्याची ही शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सर्व अनुदानित / विना अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांकडून अशा नुकसानाची माहिती गोळा करून देण्याचे निर्देश शिक्षण निरीक्षकांनी मुख्याध्यापकांना शनिवारी दिले. मात्र ही माहिती गोळा कारण्यासाठी त्यांना अवघ्या काही तासांचाच कालावधी देण्यात आला. या वेळेत जर शाळांचे नुकसान झालेच असेल तर माहिती विस्तृत रूपात कशी द्यावी असा प्रश्न मुख्याध्यापकांपुढे उभा राहिला. प्रपत्रात जरी नुकसानीचा प्रकार आणि त्यासाठी आवश्यक दुरुस्तीसाठी अनुदानाची रक्कम भरायची असली तरी त्यासाठी जुजबी माहिती गोळा करून देणे आवश्यक असल्याचे मत काही मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. त्यामुळे इतक्या कमी वेळात माहिती कशी द्यावी हा पेच मुख्यध्यापकांपुढे उभा राहिला आहे.यासाठी गुगल फॉर्मची एक लिंक तयार करण्यात आली आहे. ही माहिती दिल्यानंतर ही ती मदत मिळेल की नाही याबाबतही मुख्याध्यापकांनी सवाल उपस्थित केला आहे. माहिती मागवली जाते मात्र शासन काही मदत देत नसल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई सचिव प्रशांत रेडीज यांनी दिली.

टॅग्स :Schoolशाळाfloodपूर