शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

उदयनराजेंच्या डोक्यात अजूनही सरंजामशाहीच! जितेंद्र आव्हाड यांची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 16:25 IST

लोकशाही समजून घेण्याच्या ते सध्या मूडमध्ये नाही...

ठळक मुद्देसरकार कर्जमाफीमध्ये गंभीरपणे उर्वरीत सर्व शेतकऱ्यांना न्याय देणारसगळ्यांना माणूस म्हणून जगू द्या, असा आव्हाडांनी दिला सल्ला दिला.

बारामती : ते राजे महाराज आहेत आम्ही सामान्य प्रजेतली माणसं आहोत. त्यामुळे ते आम्हाला मारू शकतात. तसेच उदयनराजे यांच्या डोक्यात अजूनही सरंजामशाहीच आहे. पण देशात सध्या लोकशाही आहे हे त्यांना माहीतच नाही आणि लोकशाहीत सर्वजण समान आहेत हे समजून घेण्याच्या मूडमध्ये ते नाहीत,  अशी खरमरीत टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंवर केली. 

सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितिन यादव यांच्या निवासस्थानी आव्हाड यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते, सुब्रमण्यम स्वामी, योगेश सोमण यांच्यासह उदयनराजे व त्यांच्या समर्थकांचा आव्हाड यांनी चांगलाच  समाचार घेतला. तसेच गृहनिर्माण व कर्जमुक्तीत सरकार गंभीरपणे काम करणार असल्याचे आश्वासनही दिले.  उदयनराजे यांना आपण लोकशाहीपूर्ण जगात आहोत हे अजूनही लक्षात येत नाही. डा. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या घटनेनुसार सर्वजण समान आहेत. भाजपाची महाराजांबद्दलची असूया अजून संपत नाही. कालच एका भाजपाच्या आमदाराने महाराजांची उंची मोदींमुळे आणखीन वाढली असे वक्तव्य केले. भाजपाने याबाबत खुलासा करावा, असे आव्हानही आव्हाड यांनी दिले. मंदीमुळे 'बिल्डींग' उद्योगही अडचणीत आहे. या उद्योगात बिल्डरसोबत 267 प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय त्यावर जगतात. वेगवेगळ्या प्रयोगातून  बिल्डर जिवंत ठेवून गरीबांना परवडतील अशी घरे मिळवून द्यावी लागतील. या इंडस्ट्रीला तीन महिन्यात सुगीचे दिवस आणण्यासाठीच साहेबांनी मला गृहनिर्माण दिले आहे. रीबांना घरासाठी मदत होणार असेल तर आक्रमकपणे या इंडस्ट्रीला जिवंत करण्यासाठी मोठ्या बँकांशी बोलतोय, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच सरकार कर्जमाफीमध्ये गंभीरपणे उर्वरीत सर्व शेतकऱ्यांना न्याय देणार आहे. दोन लाखांच्या वरील आणि नियमित कर्जदारांना मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.

आव्हाड म्हणाले, तसेच सीएए, एनआरसी हा बहुजनांविरूध्दचा डाव आहे. वडील-आजोबांचे प्रमाणपत्र किंवा खापरपणजोबाची स्मशानभूमी आम्हाला सांगता येणार नाही. तुलनेने मुस्लिमांचा खानदानी कबरखाना असतो, ख्रिश्चनाचं रेकॉर्ड आहे. भटक्या विमुक्तांकडे, बहुजनांकडे काय रेकॉर्ड आहे? जमीन नाही किंवा वास्तव्याचा दाखला नाही. भाजपा असा जातीयवाद वाढवत आहे. माणसाला माणूस मानणार का नाही? असा सवाल त्यांनी केला. घटनेवर चचेर्वेळी प्रास्ताविका सुरू करताना देवाचे नाव टाकून सुरू करण्याबाबत डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी विरोध केला. जिजस, अल्ला, बुध्द अशीही नावे टाकायची का?  असा सवाल केला. त्यानंतर वुई द पिपल... अशी सुरवात केली. बहुसंख्यांकवादावर दादागिरी करता येत नाही. पण अजूनही भाजपाला समाजव्यवस्था समजत नाही ते पुन्हा जातीयवाद सुरू करत आहेत. इंग्रज काळात फासेपारध्यांसाठी सेटलमेंट कँप होता. आता त्यांच्यासाठी डिटेंशन कँप काढला जात आहे. आसाममध्ये मुसलमानांना टार्गेट करायला गेले आणि एकोणीस लाखापैकी चौदा लाख हिंदू निघाले. त्यामुळे ते फसले आहेत. स्थानिक हिंदू आणि बाहेरचे यांच्यात वाद लागलाय. माणूस म्हणून जगू द्या सगळ्यांना, असा आव्हाडांनी सल्ला दिला.

टॅग्स :BaramatiबारामतीJitendra Awhadजितेंद्र आव्हाडUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा