शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 17:13 IST

Groom Died on Wedding Day: संसाराची स्वप्न रंगवली, पण सुरू होण्याआधीच नियतीला साथीदाराला हिरावून घेतलं. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच नवरीच्या मांडीवर नवरदेवाने प्राण सोडले. गडचिरोलीत ही घटना घडली. 

Maharashtra News: सुखी संसाराची स्वप्ने पाहत त्या दोघांनी रेशीमगाठ बांधली. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी स्वागत समारंभही झाला. मात्र, पोटात वेदना होत असल्याचे निमित्त झाले अन् नवरीसह उपचारासाठी दवाखान्यात जाताना वेदना असहा झाल्या. अखेर जीवनसाथीसोबतच्या पहिल्या प्रवासातच नवरदेवाने तिच्या मांडीवर डोके ठेवून प्राण सोडले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

काळीज पिळवटणारी ही घटना तालुक्यातील गहाणेगोटा येथे ३ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली. नारायण कंवलसिंह बोगा (२६, रा. गहाणेगोटा) असे मृत नवरदेवाचे नाव आहे. तो शेती व मजुरीकाम करायचा.

आधी पती गेला आता मुलगा

१५ वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरपले. तेव्हापासून आई आणि नारायण दोघेच राहायचे. परिस्थितीशी दोन हात करत माय-लेकरे गुजराण करत होते. उपवर झाल्यानंतर नारायणसाठी स्थळ शोधणे सुरू झाले. ३० एप्रिलला छत्तीसगड राज्यातील मानपूर-चौकी तालुक्यातील माधोपूर येथील फिरूराम कुमेटी यांच्या दीपिका या मुलीशी त्याचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला. 

वाचा >>कौटुंबिक कलाहातून पतीपत्नीने संपवले जीवन; दोघांच्या टोकाच्या निर्णयाने दोन मुले झाली पोरकी

दुसऱ्या दिवशी १ मे रोजी नारायणने गावी स्वागत समारंभघेतला. यावेळी त्याने गोडधोड जेवणाचा बेत आखला होता.

लग्नाच्या दिवशी पोटात दुखत असल्याचे त्याने नातेवाइकांना सांगितले होते. त्यामुळे स्वागत समारंभाच्या दिवशी तो बेतकाठी येथील एका खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेऊन परतला.

पोटात वेदना सुरू झाल्या आणि तो गेलाच

२ मे रोजी देखील त्याची प्रकृती बरी होती. मात्र, ३ मे रोजी पुन्हा त्याच्या पोटात वेदना सुरू झाल्या. त्यामुळे नववधू दीपिका व एका मित्राला सोबत घेऊन दुचाकीवरून तो वासळी येथील दवाखान्यात जाण्यास निघाला, परंतु बोरी गावाजवळ जाताच त्याची प्रकृती अधिकच बिघडली. 

मोटारसायकल थांबवून त्याने नववधूच्या मांडीवर डोके टेकले आणि प्राण सोडला. विशेष म्हणजे नारायण स्वतः दुचाकी चालवित होता. लग्नानंतर पत्नीसोबतचा त्याचा पहिलाच प्रवास होता, परंतु नियतीच्या मनात वेगळेच होते.

लग्नघरी शोककळा

नारायण व दीपिका यांचे लग्न होऊन तीनच दिवस झाले होते. अंगावरील हळद उतरण्यापूर्वीच नारायणला नियतीने हिरावून घेतले. त्यामुळे सुखी संसाराचे स्वप्न अधुरेच राहिले.

लग्नामुळे घरी आनंदाचे वातावरण होते, पण या घटनेने हे क्षण दुःखात बदलले. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :marriageलग्नDeathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस