शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

ना शवविच्छेदन, ना पंचनामा; गारपिटीत मृत्यू झालेली जनावरं गोठ्यातच पडून; शेतकरी हतबल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 11:52 AM

तुफान गारपिटीत 300 पोपटांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

जालना: राज्यातील शेतकऱ्यांना गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीबरोबरच पशुधनाची हानी झाल्यामुळे दुहेरी फटका बसला आहे. या सगळ्याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सध्या सरकारी अधिकाऱ्यांच्या कृपाकटाक्ष आपल्यावर कधी पडेल, याची प्रतिक्षा करावी लागत आहे. जालन्यात यामुळे अनेक जनावरांचे मृतदेह गोठ्यातच पडून आहेत. गारपिटीमुळे मृत्यू पावलेल्या जनावरांचे शवविच्छेदन केल्याशिवाय मदत मिळणार नाही, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत अनेक ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांकडून पंचनामे होण्याचे काम बाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी गारपिटीत मृत्यूमुखी पडलेली त्यांची जनावरे घराबाहेर तशीच ठेवून दिली आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सध्या या भागाचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांना अनेक शेतकऱ्यांच्या घरासमोर मेलेली जनावरे आढळून आली. यावरून विरोधकांकडून भाजपा सरकारला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. विदर्भातदेखील पक्ष्यांना गारपिटीचा मोठा फटका बसला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे मंगळवारी रात्री झालेल्या तुफान गारपिटीत 300 पोपटांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून येथील शिव मंदिराजवळ पिंपळाच्या झाडांवर पोपटांची मोठी वस्ती होती. मंगळवारच्या तुफान गारपिटीत या झाडावरील बहुतांश पोपट जखमी झाले आहेत. यापैकी 300 पोपटांचा दुर्देवी अंत झाला होता. 

टॅग्स :FarmerशेतकरीHailstormगारपीट