शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

कलिंगडाच्या पिकात शेतकरी टाकतोय उसाचे चिपाड, त्यावर शिंपडतोय गुळाचे पाणी; कशासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:25 IST

Watermelon Farming Tips: शेतकऱ्याने लढविली शक्कल. कलिंगड या पिकाचे उत्पादन हे तीन महिन्यांत मिळते. त्यामुळे कमी वेळात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे.

उन्हाळ्याचे दिवस येऊ घातले आहेत. बाजारात कलिंगड दिसू लागले आहेत. अद्याप उकाड्याला वेळ असला तरी तुम्हाला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी शेतकरी कष्ट करत आहेत. अनेक एकरांमध्ये गावोगावी कलिंगडाची लागवड करण्यात येत आहे. लागवडीनंतर दोन-तीन महिन्यांतच फळे धरू लागतात. ती बाजारात येतात. लाल, रसाळ पाणी असलेली फळे लोक घेतात आणि उकाड्यात आपली तहान भागवतात. शेतकऱ्याला कमी वेळेत चांगले पैसे मिळतात. यासाठी उत्पादनही चांगले यावे लागते. म्हणून एका शेतकऱ्याने शक्कल लढविली आहे. 

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बु. येथील प्रगतिशील शेतकरी वसंत पाटील यांनी आपल्या सव्वा एकर शेत जमिनीत कलिंगडाचे पीक लागवड केली आहे. आता या वेलींना फुले येई लागली आहेत. येत्या दीड-दोन महिन्यांत त्यांचे पिक बाजारात जाईल. परंतू, चांगले पीक येण्यासाठी त्यांनी एक शकक्ल लढविली आहे. 

कलिंगडाच्या रोपांना फुले येऊ लागली आहेत. आता त्यांचा परागीकरणाचा काळ सुरु झाला आहे. फुलपाखरे, मधमाशा तिथे रुंजी घालणार आहेत. या फुलांचे चांगले परागीकरण होण्यासाठी व जास्त पीक येण्यासाठी पाटील यांनी शेतात ठिकठिकाणी रसवंती गृहातून टाकलेले उसाचे चिपाड आणून टाकले आहे. तसेच त्यावर गुळाचे पाणी शिंपडत आहेत. 

असे केल्याने काय होते...असे केल्याने गुळाच्या पाण्याच्या वासाला मधमाशी आकर्षित होते व या भागात येते. यामुळे शेतात परागीकरण होण्यास मदत होते. परागीकरण चांगले झाले तर फळधारणादेखील चांगली आणि मोठ्या प्रमाणावर होते. याचा उत्पादनावर परिणाम होतो व चांगले उत्पन्न मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

इतर शेतकऱ्यांनीही करावे का...पाटील यांना या गोष्टीचा अनुभव आला आहे. यामुळे त्यांनी इतर शेतकऱ्यांनाही हा प्रयोग करून पहावा. यासाठी जास्त खर्च नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी