शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

Farmer Suicide: अनेक 'गणेश माडेकर' आत्महत्येच्या टोकावर?, शिवसेनेचे सरकारला अ'नेक' सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 09:15 IST

Farmer Suicide: विदर्भात यंदा अतिवृष्टीमुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याच नुकसानीची सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर केंद्रीय पथक तर शुक्रवारी राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी पाहणी केली.

मुंबई - महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी झाला. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळताच, शेतकरी महाराष्ट्राला आत्महत्यामुक्त करायचा संकल्प नवनियुक्त सीएम एकनाथ शिंदेंनी केला. मात्र, शिंदेंच्या या संकल्पा सत्यात कधी उतरणार हाच खरा प्रश्न आहे. कारण, महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्यांत 100 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर, दोनच दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यात एका बळीराजाने चक्क विद्युत तार तोंडात घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. शिवसेनेनंही सरकारच्या धोरणावरुन टिका करत शेतकऱ्यांसंदर्भातील अ'नेक' सवाल शिंदे सरकारला केले आहेत. 

विदर्भात यंदा अतिवृष्टीमुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याच नुकसानीची सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर केंद्रीय पथक तर शुक्रवारी राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी पाहणी केली. हवालदील शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा असल्याच्या पार्श्वभूमीवरच भदाडी नदीच्या पुरात पीक खरडून गेलेल्या एका शेतकऱ्याने थेट विद्युत तार तोंडात घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे पुढे आले आहे. गणेश श्रावण माडेकर (३६) रा. पढेगाव असे मृत्यूस कवटाळलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या ह्रदय पिळवून टाकणाऱ्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मुखपत्रातून शिंदे सरकारवर टिका केली आहे. तसेच, शेतकरी आत्महत्येच्या टोकावर असल्याचे सांगत अनेक सवालही केले आहेत. 

शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होऊनही प्रत्यक्ष आर्थिक मदत जर शेतकऱ्याच्या पदरात पडत नसेल तर त्याने जगायचे कसे? झालेले नुकसान सोसून पुढच्या हंगामासाठी जिद्दीने उभे राहायचे कसे? हवालदिल शेतकऱ्यांना तुमचे दौरे नकोत, आर्थिक मदत हवी आहे. 'एनडीआरएफ' पेक्षा दुप्पट मदतीच्या गमजा मारल्या ना? मग आता ती देताना हात का आखडले आहेत?, असा सवाल शिवसेनेनं केला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार ते दीड लाखापर्यंत मदतीची गरज असताना जेमतेम साडेतेरा हजार रुपये तुम्ही जाहीर केले. पुन्हा तेदेखील तुम्ही देत नसाल तर हे पाप आहे. त्यामुळे हताश झालेले अनेक 'गणेश माडेकर ' आज राज्यात आत्महत्येच्या टोकावर आहेत. हे दुसरे पाप आहे. कुठे फेडणार हे पाप? घोषणा जोरात, सरकार कोमात आणि बळीराजा मृत्यूच्या दारात एवढी भयंकर अवस्था महाराष्ट्राची कधीही झाली नव्हती, अशा शब्दात शिवसेनेकडून शिंदे सरकावर टिकेचे बाण सोडण्यात आले आहेत. 

माडेकर कुटुंबाने जगायचं कसं?

महाराष्ट्रात सध्या पावसाबरोबरच राज्यकर्त्यांच्या घोषणांचाही पाऊस रोजच पडत आहे. बळीराजाच्या नावानेही काय कमी घोषणा विद्यमान सरकारने केल्या? पण घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ अशी सगळी स्थिती आहे. त्यामुळे अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेला बळीराजा मदतीविना कोरडाच आहे आणि हवालदिल हेऊन मृत्यूला कवटाळीत आहे. वर्धा जिल्हय़ातील सावंगी (मेघे) जवळ असलेल्या पढेगाव येथे तर गणेश माडेकर या तरुण शेतकऱ्याने थेट प्रवाहित विजेची तारच तोंडात धरून जीवनयात्रा संपवली. गणेश यांचे वयोवृद्ध माता-पिता, पत्नी आणि दोन कच्ची-बच्ची यांनी आता कसे जगायचे? हे सगळं भयंकर आहे. मात्र त्यापेक्षाही भयंकर फक्त 'कोरडे' पाहणी दौरे आणि पोकळ घोषणा यात मग्न असलेले राज्यातील सरकार आहे. गणेश यांना शासकीय नुकसानभरपाई वेळेत मिळाली असती तर कदाचित त्यांनी टोकाचे पाऊल उचलले नसते. मात्र तसे घडले नाही.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेfarmer suicideशेतकरी आत्महत्याVidarbhaविदर्भChief Ministerमुख्यमंत्री