शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

चिठ्ठीत मोदींचं नाव लिहून शेतकऱ्यानं केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 3:32 PM

आत्महत्येसाठी मोदींना धरलं जबाबदार

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. यवतमाळमध्ये एका ५५ वर्षीय शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. विष प्राशन करुन त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या करत असल्याचं या शेतकऱ्यानं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिलं आहे. याशिवाय त्यानं मोदी सरकारला आत्महत्येसाठी जबाबदार धरलं आहे. यवतमाळच्या घाटनजीमधील राजुरवाडीत राहात असलेल्या शंकर भाऊराव चायरे यांनी मंगळवारी आत्महत्या करुन आयुष्य संपवलं. शंकर चायरे यांनी आत्महत्येपूर्वी सहा पानी चिठ्ठी लिहिली. 'मी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे आणि माझ्या आत्महत्येला मोदी सरकार जबाबदार आहे,' असे चायरे यांनी चिठ्ठीत म्हटलं आहे. यासोबतच चायरे यांनी त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आमदार राजू तोडसम यांना केलं आहे. शंकर चायरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 'त्या चिठ्ठीत पंतप्रधान मोदींच्या नावाचा उल्लेख आहे. शंकर चायरेंनी त्यांच्या आत्महत्येसाठी मोदींनाच जबाबदार धरलं आहे. मात्र आम्ही अद्याप त्या चिठ्ठीची सत्यता तपासत आहोत,' असे यवतमाळचे पोलीस अधीक्षक राज कुमार यांनी सांगितले. चायरे यांच्या नावावर नऊ एकर शेती आहे. त्यांच्यावर बँका आणि सावकरांचं १.४० लाख रुपयांचं कर्ज होतं. त्यामुळे ते तणावाखाली होते. याशिवाय बोंडअळीमुळे त्यांच्या शेतातील कापसाचं मोठं नुकसान झालं होतं.  

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याNarendra Modiनरेंद्र मोदी