शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

चिठ्ठीत मोदींचं नाव लिहून शेतकऱ्यानं केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 15:32 IST

आत्महत्येसाठी मोदींना धरलं जबाबदार

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. यवतमाळमध्ये एका ५५ वर्षीय शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. विष प्राशन करुन त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या करत असल्याचं या शेतकऱ्यानं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिलं आहे. याशिवाय त्यानं मोदी सरकारला आत्महत्येसाठी जबाबदार धरलं आहे. यवतमाळच्या घाटनजीमधील राजुरवाडीत राहात असलेल्या शंकर भाऊराव चायरे यांनी मंगळवारी आत्महत्या करुन आयुष्य संपवलं. शंकर चायरे यांनी आत्महत्येपूर्वी सहा पानी चिठ्ठी लिहिली. 'मी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे आणि माझ्या आत्महत्येला मोदी सरकार जबाबदार आहे,' असे चायरे यांनी चिठ्ठीत म्हटलं आहे. यासोबतच चायरे यांनी त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आमदार राजू तोडसम यांना केलं आहे. शंकर चायरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 'त्या चिठ्ठीत पंतप्रधान मोदींच्या नावाचा उल्लेख आहे. शंकर चायरेंनी त्यांच्या आत्महत्येसाठी मोदींनाच जबाबदार धरलं आहे. मात्र आम्ही अद्याप त्या चिठ्ठीची सत्यता तपासत आहोत,' असे यवतमाळचे पोलीस अधीक्षक राज कुमार यांनी सांगितले. चायरे यांच्या नावावर नऊ एकर शेती आहे. त्यांच्यावर बँका आणि सावकरांचं १.४० लाख रुपयांचं कर्ज होतं. त्यामुळे ते तणावाखाली होते. याशिवाय बोंडअळीमुळे त्यांच्या शेतातील कापसाचं मोठं नुकसान झालं होतं.  

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याNarendra Modiनरेंद्र मोदी