शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही दुकानातून मिळणार रास्त धान्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 19:15 IST

राज्य सरकारने १५१ तालुक्यांव्यतिरिक्त १६८ महसुली मंडळामध्ये गंभीर आणि मध्यमस्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.

ठळक मुद्दे ९३१ गावांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती असल्याचे घोषित सध्या राज्यातील अन्नसुरक्षेतील लाभार्थ्यांना ई पॉस यंत्राद्वारे धान्य वितरीत

पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रोजगारासाठी विविध ठिकाणी स्थलांतरीत होणाऱ्या शेतकऱ्यांना संबंधित ठिकाणच्या रास्त धान्य दुकानातून धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्थलांतर झालेल्या ठिकाणच्या कोणत्याही रास्त धान्य दुकानातून धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने १५१ तालुक्यांव्यतिरिक्त १६८ महसुली मंडळामध्ये गंभीर आणि मध्यमस्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्या व्यतिरिक्त ९३१ गावांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती असल्याचे घोषित केले आहे. सध्या राज्यातील अन्नसुरक्षेतील लाभार्थ्यांना ई पॉस यंत्राद्वारे धान्य वितरीत केले जाते. या यंत्राच्या वापरामुळे कोणत्याही दुकानातून धान्य घेणे शक्य आहे. तशी सुविधा देखील ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दुष्काळी स्थितीत शहरी आणि निमशहरी भागात स्थलांतर होत असते. या काळात शिधापत्रिकेवरील धान्यापासून नागरीक वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थलांतरणाच्या ठिकाणी देखील शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा व्हावा यासाठी दुष्काळी भागातील स्थलांतरीतांसाठी कोणत्याही दुकानातून धान्य मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारFarmerशेतकरीdroughtदुष्काळ