शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

चांगला जाहीरनामा लोकांपर्यंत नेण्यात काँग्रेसला अपयश : सुहास पळशीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:47 PM

कॉंग्रेसकडे सांगायला कथा तर आहे पण ती सांगणारे समर्थ नेतृत्व नाही.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यां प्रादेशिक राजकारण मोडून काढण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू मोदी पुन्हा सत्तेत आले तर देशात निवडणूक होणार नाही, अशी व्यक्त होणारी भीती निरर्थकमहाराष्ट्रात बहुजन वंचित आघाडीचा फटका काँग्रेस आघाडीला बसण्याची शक्यताराफेल मुद्दा लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये

पुणे : ‘‘मोदी विरोधकांकडे प्रचारासाठी कोणताच राष्ट्रीय मुददा नसल्याने त्यांचा प्रचार स्थानिक पातळीवरच सुरू आहे. कॉंग्रेसकडे सांगायला कथा तर आहे पण ती सांगणारे समर्थ नेतृत्व नाही. राहुल गांधी यांची स्विकारार्हता कमी आहे. काँग्रेसचा जाहिरनामा चांगला असला तरी तो जनतेपर्यंत पोहोचवायला कोणी नाही,’’ असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी व्यक्त केले. भाजपाच्या जागा २२० पेक्षा कमी निवडून आल्या तरच त्रिशंकू अवस्था निर्माण होऊ शकते, असेही ते म्हणाले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘2019 ची निवडणूक समजून घेताना’ या विषयावर पळशीकर बोलत होते. संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील आणि सरचिटणीस पांडुरंग सांडभोर यावेळी उपस्थित होते.

भाजपच्या प्रचार रणनितीविषयी बोलताना पळशीकर म्हणाले, की 2014च्या निवडणूकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक राजकारण मोडून काढण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणूक राष्ट्रीय मुद्यांवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. या विषयांवर बोलण्यासाठी पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश आदी राज्यांमधल्या प्रादेशिक पक्षांकडे मुद्दे नसतात. या रणनितीपुढे प्रादेशिक पक्षांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागते. बिजु जनता दलाच्या नवीन पटनायक यांना केंद्रातल्या निवडणुकीसाठी तुम्ही हवा तो विचार करा, राज्यात मात्र आम्हाला मत द्या, असे आवाहन करावे लागते, यावरुन हे स्पष्ट होते. हिंदूत्त्व, राष्ट्रवाद, सुरक्षा या प्रश्नांपुढे प्रादेशिक अस्मिता बाजूला ठेवा, हे ठसवण्याचा मोदींचा प्रयत्न असतो. मोदींच्या निवडणुकीच्या प्रचाराची विकास, राष्ट्रवाद आणि हिंदू राष्ट्रवाद ही त्रिसूत्री आहे. केवळ विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविणे अवघड जाईल हे मोदींना माहिती आहे. देशापुढचे प्रश्न जटील असून ते सोडविण्यासाठी देवदूत आला असल्याचे भावनिक वातावरण निर्माण करण्यात मोदींना २०१४ मध्ये यश आले. त्यांच्या या प्रतिमेला अद्यापही तडा गेलेला नाही. आम्हीच राष्ट्रवादी आहोत आणि भारताबददल आमच्या खेरीज कुणालाच प्रेम नाही हे त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवले आहे. त्यामुळे ‘पुलवामा'तला हल्ला हा सुरक्षा व्यवस्थेतला गलथानपणा होता, यापेक्षाही राष्ट्रीय सुरक्षा कशी धोक्यात आहे, त्यानंतर हवाई हल्ले करुन कसे प्रत्युत्तर दिले, हेच सूत्र जनमानसात रुजवण्यात मोदी यशस्वी ठरले. मात्र निवडणूका टप्प्यांमध्ये होणार असल्याने याही मुद्यांचा प्रभाव आता ओसरला आहे, याकडेही पळशीकर यांनी लक्ष वेधले.  ...................पळशीकर म्हणतात* राफेल मुद्दा लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये. ‘काहीतरी झालं असेल पण मोदींनी काही केले नाही,' हीच मतदारांची मानसिकता आहे.* मनसेचे नेते राज ठाकरे आघाडीत नाहीत. त्यामुळे त्यांच्या सभांना प्रतिसाद मिळत असला तरी त्याचा निवडणुकीवर परिणाम होण्यावर मर्यादा आहेत.* ‘मोदी पंतप्रधान व्हावेत,’ असे भाजपाचे नसलेल्या मतदारांनाही वाटते. समर्थक यांना वाटते. ‘दुसरे कोण आहे,' अशी संभ्रमाची अवस्था त्यामागे आहे. हा भाजपासाठी ‘प्लस पॉईंट’ आहे * उत्तरप्रदेशात भाजपच्या 30 ते 40 जागा कमी होऊ शकतात. निरर्थक भीतीमोदी पुन्हा सत्तेत आले तर देशात निवडणूक होणार नाही, अशी व्यक्त होणारी भीती निरर्थक असल्याचे मत पळशीकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, जे मोदी दोन निवडणुका जिंकू शकतात ते तिसरी निवडणूकही जिंकू शकतील. मग त्यांनी निवडणूक न घेण्याचे कारण काय?‘बहुजन वंचित’चा फटका काँग्रेस आघाडीला?         महाराष्ट्रात बहुजन वंचित आघाडीचा फटका काँग्रेस आघाडीला बसण्याची शक्यता आहे. स्वतंत्र लढण्यामागे प्रकाश आंबेडकरांचे विधानसभेचे गणित असू शकते. वंचित आघाडीतल्या एमआयएमसोबत कॉंग्रेस गेली असती तर त्यांच्यासाठीही तो आत्मघात ठरला असता. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक