शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

मोदींच्या योजना पोहोचविण्यात कमी पडलो, ही वेळच आली नसती; मंत्री विजयकुमार गावितांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 7:19 PM

धुळ्यातील शिरपूरमध्ये गावित यांनी नमो संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी मोदींच्या जनतेसाठीच्या योजना पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो, असे म्हटले आहे. 

केंद्र सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची, सांगण्याची जबाबदारी राज्यातील नेत्यांवर देण्यात आली आहे. यासाठी हे नेते प्रचारामध्ये मोदींच्या योजना सांगत आहेत. अशातच राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी अजब विधान केले आहे. 

धुळ्यातील शिरपूरमध्ये गावित यांनी नमो संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी मोदींच्या जनतेसाठीच्या योजना पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो, असे म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी पाठविलेल्या योजना आम्ही पोहोचवण्यात कमी पडलो. आम्ही या योजना पोहोचवू शकलो असतो तर खूप मोठे काम झाले असते, असे वक्तव्य गावित यांनी केले. या योजना पोहोचल्या असत्या तर अशा बैठका घेत लाभार्थ्यांकडे जा हे करा ते करा करण्याची वेळच आली नसती, अशी देखील कबुली गावितांनी दिली आहे. 

शिरपूर येथे नंदुरबार लोकसभेच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारार्थ नमो संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  या मेळाव्यादरम्यान मंत्री गावित यांच्या या विधानामुळे सर्वसामान्यांपर्यंत योजना पोहोचविण्यात राज्याचे मंत्री कमी पडले आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

टॅग्स :Vijaykumar Gavitविजय गावीतNarendra Modiनरेंद्र मोदीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपा