शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

वंचित, एमआयएम, सपा अपवाद वगळता प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांमध्ये यंदा झाली घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:24 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही १.४५ टक्के मतांचा फटका बसला आहे. मागच्या वेळेच्या ३.७ टक्के मतांच्या तुलनेत त्यांना यंदा २.२५ टक्केच मते मिळाली आहेत.

प्रसाद गो. जोशी  

नाशिक : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना मिळालेल्या मतांमध्ये गतवेळेपेक्षा घट झालेली दिसून येत आहे. याला अपवाद ठरले ते वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि समाजवादी पार्टी हे पक्ष!

यंदा विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक म्हणजे २५.७५ टक्के मते मिळाली. मागील निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे लढूनही या पक्षाला २७.८ टक्के मते मिळाली होती. यंदा शिवसेनेबरोबर युती असून भाजपची मते २.१ टक्क्यांनी कमी झाली आहेत.शिवसेनेला यावेळी १६.४१ टक्के मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेने स्वतंत्रपणे लढून १९.३ टक्के मते मिळवली होती. याचाच अर्थ युती करूनही यंदा त्यांची २.९ टक्के मते घटली आहेत. युतीमध्ये इतरही अनेक पक्ष असले तरी त्यापैकी अनेकांनी भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढविली. त्यामुळे त्यांच्या मतांची वेगळी नोंद नाही. ते गृहित धरल्यास भाजपच्या मतांची टक्केवारी सध्यापेक्षा अधिकच घटलेली असणार हे निश्चित आहे. आपल्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीलाही मागील वेळेपेक्षाकमी मते मिळाल्याचे दिसत आहे. मागील निवडणूक हे दोन्ही पक्ष वेगवेगळी लढले होते. यंदा ते एकत्र असूनही त्यांच्या मतांची टक्केवारी मात्र वाढू शकली नाही. या निवडणुकीमध्ये कॉँग्रेसला १५.८७ टक्के मते मिळाली आहेत. मागील वेळेला (१८ टक्के) असलेल्या मतांच्या तुलनेत यंदा २.१ टक्क्याांची घट झाली आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसचीही मते घटली असली तरी त्याचे प्रमाण त्यामानाने बरेच कमी आहे. मागील वेळेपेक्षा (१७.२ टक्के) राष्ट्रवादीला यावर्षी ०.५ टक्के मते कमी पडली आहेत. राष्ट्रवादीला एकूण १६.७१ टक्के मतदारांची मते मिळाली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही १.४५ टक्के मतांचा फटका बसला आहे. मागच्या वेळेच्या ३.७ टक्के मतांच्या तुलनेत त्यांना यंदा २.२५ टक्केच मते मिळाली आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीलाही कमी मतदान झाले आहे.याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला ०.३७ टक्के मते मिळाली आहेत. मागील तुलनेत ती ०.०३ टक्के कमी झाली आहेत. याशिवाय आप (०.१० टक्के), बहुजन समाज पार्टी (०.९२ टक्के),भाकपा (०.०६ टक्के), मुस्लीम लीग आणि जनता दल (एस) (प्रत्येकी ०.०१ टक्के), अन्यपक्ष व अपक्ष (१८.६२ टक्के) ही अन्य पक्षांची यंदाच्या निवडणुकीतील मते आहेत.केवळ यांचाच फायदाया निवडणुकीमध्ये एमआयएम व समाजवादी पार्टी या दोन पक्षांचा मतांचा टक्का वाढला आहे. लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीबरोबर एमआयएमची युती होती. यावेळी मात्र ते स्वतंत्रपणे निवडणूक लढले व त्यांना १.३४ टक्के मते मिळाली. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना ०.९ टक्के मते मिळाली. म्हणजेच यंदा त्यांना ०.४४ टक्के जादा मतांचा लाभ झाला आहे. त्याचप्रमाणे समाजवादी पार्टीच्या मतांमध्येही ०.०२ टक्क्यांची अल्प वाढ झाली आहे. यावर्षी सपने ०.२२ टक्के मते घेतली आहेत.‘वंचित’ला सर्वाधिक लाभ : यावेळी वंचित बहुजन आघाडीला मतदारांनी हात दिला. गेल्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप-बहुजन महासंघ मैदानात होता. त्यांना एका जागी विजय मिळाला होता. तसेच ०.९ टक्के मते मिळाली होती. यंदा प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नावाने निवडणूक लढविली. त्यांना एकही जागा जिंकता आली नसली तरी एकूण ४.६ टक्के मते मिळाली. त्यांना ३.७ टक्के अधिक मतांचा लाभ झाला.

टॅग्स :MNSमनसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी