शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

"आणीबाणीची आठवण झाली, जनता याचा बदला घेईल"; रावसाहेब दानवेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 09:34 IST

राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याला अटक केली.

राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याला अटक केली. त्यानंतर या दोघांना भेटायला गेलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली. सोमय्या यांच्या हनुवटीला यात जखम झाली असून त्यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सोमय्यांवरील हल्ल्यावरुन भाजपा आता आक्रमक झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील गुंडगिरीच्या घटना पाहता लोकशाही धोक्यात आली आहे याचं उदाहरणच काल पाहायला मिळालं असं रावसाहेब दानवे म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

"राणा दाम्प्त्याच्या मातोश्रीवर धडक देण्याच्या भूमिकेचं समर्थन करता येणार नाही. पण त्यांनी फक्त हनुमान चालीसा पठण करण्याची मागणी केली होती. त्यात चुकीचं काय होतं? हनुमान चालीसाला इतका विरोध कशासाठी? आणि ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते हैदोस घालत होते ते पाहता विरोधकांची मुस्कटदाबी करणं हेच या सरकारचं उद्दीष्ट बनलं आहे. ही अशीच परिस्थिती आणीबाणीच्या काळात पाहायला मिळाली होती. पण जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. जनताच याचं उत्तर देईल", असं रावसाहेब दानवे म्हणाले. 

"ज्या राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर धडकण्याची भूमिका घेतली त्यांना पोलीस नोटीस देतात. पण त्यांच्या घराबाहेर हैदोस घालणाऱ्यांना पोलिसांनी काहीच केलं नाही. त्यांच्याविरोधात एकही तक्रार दाखल केली जात नाही. किरीट सोमय्यांच्या गाडीवर पोलिसांच्या उपस्थितीत हल्ला होतो. त्याबाबतही पोलीस तक्रार दाखल करत नाहीत. महाराष्ट्र पोलिसांनी एवढं नाव कमावलं. पण त्यांना बदनाम करण्याचं काम राज्य सरकार करत आहे. पोलिसांना पुढे करुन राजकारण करण्याचा धंदा राज्य सरकार करत आहे", असं दानवे म्हणाले. 

"राणा दाम्पत्य आणि अण्णा हजारे यांची तुलना मी करणार नाही. पण अण्णा हजारे जेव्हा काही प्रश्नांना घेऊन उपोषणाला बसतात तेव्हा सरकार त्याची दखल घेऊन सरकारचे प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करुन तोगडा काढतात हे आपण पाहिलं आहे. मग राणा दाम्पत्य लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांचं म्हणणं सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन जाणून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं. सरकारच्या प्रतिनिधींनी राणा दाम्पत्याची भेट घेतली असती आणि त्यांच्याशी चर्चा केली असती तर प्रकरण सोडवता आलं असतं. पण विरोधकांची केवळ मुस्कटदाबी करुन त्यांची भूमिका हाणून पाडण्याचं काम सरकार करत आहे", असंही रावसाहेब दानवे म्हणाले. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाRavi Ranaरवी राणा