शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

"आणीबाणीची आठवण झाली, जनता याचा बदला घेईल"; रावसाहेब दानवेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 09:34 IST

राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याला अटक केली.

राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याला अटक केली. त्यानंतर या दोघांना भेटायला गेलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली. सोमय्या यांच्या हनुवटीला यात जखम झाली असून त्यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सोमय्यांवरील हल्ल्यावरुन भाजपा आता आक्रमक झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील गुंडगिरीच्या घटना पाहता लोकशाही धोक्यात आली आहे याचं उदाहरणच काल पाहायला मिळालं असं रावसाहेब दानवे म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

"राणा दाम्प्त्याच्या मातोश्रीवर धडक देण्याच्या भूमिकेचं समर्थन करता येणार नाही. पण त्यांनी फक्त हनुमान चालीसा पठण करण्याची मागणी केली होती. त्यात चुकीचं काय होतं? हनुमान चालीसाला इतका विरोध कशासाठी? आणि ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते हैदोस घालत होते ते पाहता विरोधकांची मुस्कटदाबी करणं हेच या सरकारचं उद्दीष्ट बनलं आहे. ही अशीच परिस्थिती आणीबाणीच्या काळात पाहायला मिळाली होती. पण जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. जनताच याचं उत्तर देईल", असं रावसाहेब दानवे म्हणाले. 

"ज्या राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर धडकण्याची भूमिका घेतली त्यांना पोलीस नोटीस देतात. पण त्यांच्या घराबाहेर हैदोस घालणाऱ्यांना पोलिसांनी काहीच केलं नाही. त्यांच्याविरोधात एकही तक्रार दाखल केली जात नाही. किरीट सोमय्यांच्या गाडीवर पोलिसांच्या उपस्थितीत हल्ला होतो. त्याबाबतही पोलीस तक्रार दाखल करत नाहीत. महाराष्ट्र पोलिसांनी एवढं नाव कमावलं. पण त्यांना बदनाम करण्याचं काम राज्य सरकार करत आहे. पोलिसांना पुढे करुन राजकारण करण्याचा धंदा राज्य सरकार करत आहे", असं दानवे म्हणाले. 

"राणा दाम्पत्य आणि अण्णा हजारे यांची तुलना मी करणार नाही. पण अण्णा हजारे जेव्हा काही प्रश्नांना घेऊन उपोषणाला बसतात तेव्हा सरकार त्याची दखल घेऊन सरकारचे प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करुन तोगडा काढतात हे आपण पाहिलं आहे. मग राणा दाम्पत्य लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांचं म्हणणं सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन जाणून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं. सरकारच्या प्रतिनिधींनी राणा दाम्पत्याची भेट घेतली असती आणि त्यांच्याशी चर्चा केली असती तर प्रकरण सोडवता आलं असतं. पण विरोधकांची केवळ मुस्कटदाबी करुन त्यांची भूमिका हाणून पाडण्याचं काम सरकार करत आहे", असंही रावसाहेब दानवे म्हणाले. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाRavi Ranaरवी राणा