शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

"आणीबाणीची आठवण झाली, जनता याचा बदला घेईल"; रावसाहेब दानवेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 09:34 IST

राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याला अटक केली.

राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याला अटक केली. त्यानंतर या दोघांना भेटायला गेलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली. सोमय्या यांच्या हनुवटीला यात जखम झाली असून त्यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सोमय्यांवरील हल्ल्यावरुन भाजपा आता आक्रमक झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील गुंडगिरीच्या घटना पाहता लोकशाही धोक्यात आली आहे याचं उदाहरणच काल पाहायला मिळालं असं रावसाहेब दानवे म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

"राणा दाम्प्त्याच्या मातोश्रीवर धडक देण्याच्या भूमिकेचं समर्थन करता येणार नाही. पण त्यांनी फक्त हनुमान चालीसा पठण करण्याची मागणी केली होती. त्यात चुकीचं काय होतं? हनुमान चालीसाला इतका विरोध कशासाठी? आणि ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते हैदोस घालत होते ते पाहता विरोधकांची मुस्कटदाबी करणं हेच या सरकारचं उद्दीष्ट बनलं आहे. ही अशीच परिस्थिती आणीबाणीच्या काळात पाहायला मिळाली होती. पण जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. जनताच याचं उत्तर देईल", असं रावसाहेब दानवे म्हणाले. 

"ज्या राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर धडकण्याची भूमिका घेतली त्यांना पोलीस नोटीस देतात. पण त्यांच्या घराबाहेर हैदोस घालणाऱ्यांना पोलिसांनी काहीच केलं नाही. त्यांच्याविरोधात एकही तक्रार दाखल केली जात नाही. किरीट सोमय्यांच्या गाडीवर पोलिसांच्या उपस्थितीत हल्ला होतो. त्याबाबतही पोलीस तक्रार दाखल करत नाहीत. महाराष्ट्र पोलिसांनी एवढं नाव कमावलं. पण त्यांना बदनाम करण्याचं काम राज्य सरकार करत आहे. पोलिसांना पुढे करुन राजकारण करण्याचा धंदा राज्य सरकार करत आहे", असं दानवे म्हणाले. 

"राणा दाम्पत्य आणि अण्णा हजारे यांची तुलना मी करणार नाही. पण अण्णा हजारे जेव्हा काही प्रश्नांना घेऊन उपोषणाला बसतात तेव्हा सरकार त्याची दखल घेऊन सरकारचे प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करुन तोगडा काढतात हे आपण पाहिलं आहे. मग राणा दाम्पत्य लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांचं म्हणणं सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन जाणून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं. सरकारच्या प्रतिनिधींनी राणा दाम्पत्याची भेट घेतली असती आणि त्यांच्याशी चर्चा केली असती तर प्रकरण सोडवता आलं असतं. पण विरोधकांची केवळ मुस्कटदाबी करुन त्यांची भूमिका हाणून पाडण्याचं काम सरकार करत आहे", असंही रावसाहेब दानवे म्हणाले. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाRavi Ranaरवी राणा