शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

'मी बेकायदेशीर तर निवडून आलेले सर्व आमदार बेकायदेशीर'; जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 19:53 IST

Election Commission on NCP : 'शरद पवारांच्या कार्यशैलीतून ही लोकं मोठी झाली, आता शरद पवारांना प्रश्न विचारत आहेत.'

Election Commission on NCP : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केल्यानंतर पक्षावर दावा केला आहे. याप्रकरणी आज निवडणूक आयोगात सुनावणी झाली. सोमवारी चार वाजता पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीत अजित पवार गटाकडून जयंत पाटलांची (Jayant Patil) नियुक्ती बेकायदेशीर होती, असा युक्तीवाद करण्यात आला. यावर आता स्वतः जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी केला. तसेच सुनील तटकरे हेच राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, असा दावाही त्यांनी केला. यावर जयंत पाटील म्हणाले की, माझी  नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या उमेदवारांना माझ्या सहीनेच एबी फॉर्म देण्यात आले होती. जर मी बेकायदेशीर असेल, महाराष्ट्रातून सगळे निवडून आलेले आमदारदेखील बेकायदेशीर ठरवण्याचा काहीतरी डाव दिसतो. 

संबंधित बातमी- अजित पवार गटाने मृत व्यक्तींची कागदपत्रे सादर केली; शरद पवार गटाचा आरोप

मी निवडणुकीने निवडून आलेलो आहे, मी निवडून आल्यानंतर प्रफुल पटेल यांनीच मला पत्र दिले होते. संख्याबळबाबत आमचे वकील युक्तिवाद करतील. पहिल्यांदा जेव्हा घटना झाली, तेव्हा या 24 लोकांनी शरद पवारांना पाठिंबा दिला होता. पण यानंतर अजित पवार गटाने कोणाला नियुक्ती दिली असेल आणि त्यांचे त्यांना समर्थन असेल, निवडणूक आयोगाने पूर्वी अध्यक्ष कोण होते हे विचारात घेऊन निर्णय द्यावा, असं जयंत पाटील म्हणाले.

पाटील पुढे म्हणाले, पंचवीस वर्षे तुम्ही शरद पवारांसोबत काम केले. पंचवीस वर्षानंतर तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात आली असेल, तर त्याच्याबद्दल शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. इतक्या उशिरा का लक्षात आले? पक्षांतर्गत निवडणुका ज्यावेळी झाल्या, त्यावेळेस असा प्रश्न कोणी विचारला नाही. चिन्ह गोठवण्याचा प्रश्न येत नाही, कारण पक्ष आणि चिन्ह शरद पवार यांचा आहे. एखाद्याने उद्या भाजपच्या चिन्हबद्दल प्रश्न उपस्थित केला तर ते तुम्ही गोठावणार का?

शरद पवार संस्थापक आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली चालवलेल्या पक्षाला आतापर्यंत कोणीही चॅलेंज केलेले नाही. त्यांना सर्वांनी सर्वाधिकार दिलेले होते, हात उंचावून, त्याचे क्लिप सर्वांकडे आहेत. चिन्ह गोठवणे हे अन्यायकारक होईल. चिन्ह गोठण्याची एक पद्धत आहे, पण आमच्या वकिलांनी सांगितले की चिन्ह गोठवू नका. शरद पवार यांच्या कार्यशैलीतून हे लोक मोठी झाली आहे, तीच लोक आता शरद पवार यांना प्रश्न विचारत आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष