शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

आणखी २-३ दिवस आम्ही विरोधी पक्षात; नाराजीनाट्यात रावसाहेब दानवेंचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 1:59 PM

मुख्यमंत्री असताना २ वर्ष मंत्रालयात गेले नाहीत. आमदारांना भेटत नव्हते. निधी राष्ट्रवादीला मिळत होता असं दानवे म्हणाले.

जालना - आज मी केंद्रात मंत्री आहे, टोपे राज्यात मंत्री आहेत. मला अडीच वर्ष झाले तर टोपे यांना १४ वर्ष झाली. तुमच्या कारकिर्दीत आणखी काही कामे करायची असतील तर लवकर करून घ्या, वेळ निघून चालली आहे. आम्ही २-३ दिवस विरोधी पक्षात आहोत असं सूचक विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथील कार्यक्रमात बोलताना केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भाजपा पुन्हा सत्तेत येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

दानवे आणि टोपे यांच्या उपस्थितीत जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयाच भूमिपूजन करण्यात आलं. त्यावेळी दानवे म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना एकत्र सामोरे गेले. जनतेने युतीला बहुमत दिले. प्रचारात मोदी-शाह व्यासपीठावर बोलले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील. तेव्हा शिवसेना आणि शिवसैनिक काहीही बोलले नाही. परंतु जेव्हा निकालानंतर आमच्याशिवाय सरकार बनत नाही असं लक्षात आल्यानंतर असंगाशी संगत केली. ज्यांच्यावर टीका केली त्यांच्यासोबत सरकार बनवले. सरकार बनवल्यानंतरही चांगले चालवायला पाहिजे होते असं त्यांनी सांगितले. 

परंतु मुख्यमंत्री असताना २ वर्ष मंत्रालयात गेले नाहीत. आमदारांना भेटत नव्हते. निधी राष्ट्रवादीला मिळत होता, काँग्रेसला मिळत होता पण शिवसेनेच्या आमदारांना मिळत नव्हता ही त्यांची तक्रार आहे. राज्याच्या प्रश्नाकडे तिन्ही पक्षाच्या लोकांनी दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम शिवसेनेत असंतोष वाढला. आज शिवसेनेचे ४० आमदारांनी बंड केले. सरकार आम्ही पाडणार नाही असं आम्ही नेहमीच सांगितले. भाजपाचा याच्याशी काहीही संबंध नाही. आम्ही वेट अँन्ड वॉचच्या भूमिकेत आहोत असंही रावसाहेब दानवे म्हणाले. 

शिंदे-फडणवीस यांची भेट नाही एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांची भेट झाली नाही. आमच्या बैठका सुरूच असतात. आम्ही बैठका घेतो, राज्याच्या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. नाराज गटाने आमच्याकडे प्रस्ताव दिला नाही. प्रस्ताव आल्यास पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील. राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही असं सांगत रावसाहेब दानवेंनी अधिक भाष्य करणं टाळलं. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा