शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

शिक्षणासाठी आसरा हवा

By admin | Updated: October 23, 2014 23:48 IST

ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न : शिक्षण विभागाची साखर कारखानदारांना विनंती

भीमगोंडा पाटील - कोल्हापूर -कारखानदार, शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामाचे वेध लागले आहेत. अनेक कारखान्यांचे बॉयलर अग्निप्रदीपन झाले आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात बीड, उस्मानाबाद, लातूर या भागांतून ऊसतोडणी मजुरांच्या ‘टोळ्या’ दाखल होणार आहेत. या टोळ्यांसोबत येणाऱ्या त्यांच्या मुलांसाठी नियमित शाळेत शिक्षणाची सोय केली आहे. मात्र, वारंवार ऊसतोडणीच्या निमित्ताने भटकंती करणाऱ्या कुटुंबांची मुले नियमित शाळेत दाखल करताना अडचणींचा डोंंगर उभा राहत आहे. यामुळे शिक्षणापासून वंचित राहून मुलांच्या शिक्षणाची पाटी फुटण्याची वेळ येत आहे. म्हणून यंदा शिक्षण विभागाने आतापासूनच ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी ‘तुम्ही निवासाची सोय करा; आम्ही जेवण, शिक्षण देतो,’ असा प्रस्ताव कारखानदारांसमोर ठेवला आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी ऊसतोडणी मजूर जिल्ह्यात पाठीवर संसार घेऊन स्थलातंरित होत असतात. आई, वडिलांसोबत शाळेला जाणारी मुलेही असतात. पुन्हा गावाकडे जाईपर्यंत संंबंधित मुले शिक्षणापासून वंचित राहतात. यामुळे सर्वशिक्षा अभियानातून ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी हंगामी शाळा सुरू केल्या जात होत्या. ज्या गावात मुले आहेत, तेथेच शाळा सुरू केली जात होती. झाडाखालीही शिक्षणाचे धडे दिले जात होते.दरम्यान, हक्काचे शिक्षण कायदा आला. त्यामुळे दोन वर्षांपासून साखरशाळेची संकल्पना बंद झाली. स्थलातंरित कुटुंबातील मुलांना नियमित शाळेत दाखल करून घेण्याची तरतूद झाली. कोणत्याही कागदपत्राची विचारणा न करता प्रवेश दिला जातो. याचा फायदा घेऊन वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील मुले नियमित शाळेत जात आहेत. परंतु, ऊसतोडणी मजुरांना ज्या गावात ऊस असेल तेथे जावे लागते. काही वेळेला प्रत्येक दिवशी गावे बदलावी लागतात. अशावेळी संंबंधित मजुरांच्या मुलांना नियमित शाळेत दाखल करणे अडचणीचे आहे. रोज नव्या शाळेत जाणे बालमनाला रुचतही नाही. मुले स्वत:हूनच शाळेकडे पाठ फिरवितात. वारंवार स्थलांतर होणाऱ्या कुटुंबांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणताना अनेक अडथळे येत आहेत. किमान हंगाम संपेपर्यंत तरी ऊसतोडणी मजुरांची मुले कारखाना स्थळावरच राहावीत, त्या मुलांच्या वसतिगृहाची सोय संबंधित कारखान्यांनी करावी, असा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे. याला प्रतिसाद देऊन गेल्या हंगामात दत्त साखर कारखान्याने वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तेथे शिक्षण विभागाने जेवण व शिक्षणाची सोय केली. यामुळे मुलांना शिक्षण घेणे सोपे झाले. यंदा अजून कामगारांच्या टोळ्याही आलेल्या नाहीत; पण शिक्षण विभाग सर्व कारखानदारांशी संपर्क साधून ऊसतोडणी मजुरांच्या शिक्षणासाठी राहण्याची सुविधा उपलब्ध करून हातभार लावावा, अशी विनंती करीत आहे.ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना नियमित शाळेत दाखल करून घेतले जात आहे. मात्र, वारंवार स्थलांतर होणाऱ्या कुटुंंबांच्या मुलांना नियमित शाळेत दाखल करून घेताना अडचणी येत असतात. यामुळे कारखान्यांनी निवासाची सोय केल्यास शिक्षण विभाग जेवण व शिक्षणाची सोय करायला तयार आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी दत्त कारखान्याने मजुरांच्या मुलांसाठी राहण्याची सुविधा उपलब्ध केली होती. सर्व कारखान्यांनी निवासासाठी सहकार्य केल्यास मुलांची सोय होणार आहे. - स्मिता गौड (शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण, कोल्हापूर)