शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

शिक्षणासाठी आसरा हवा

By admin | Updated: October 23, 2014 23:48 IST

ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न : शिक्षण विभागाची साखर कारखानदारांना विनंती

भीमगोंडा पाटील - कोल्हापूर -कारखानदार, शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामाचे वेध लागले आहेत. अनेक कारखान्यांचे बॉयलर अग्निप्रदीपन झाले आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात बीड, उस्मानाबाद, लातूर या भागांतून ऊसतोडणी मजुरांच्या ‘टोळ्या’ दाखल होणार आहेत. या टोळ्यांसोबत येणाऱ्या त्यांच्या मुलांसाठी नियमित शाळेत शिक्षणाची सोय केली आहे. मात्र, वारंवार ऊसतोडणीच्या निमित्ताने भटकंती करणाऱ्या कुटुंबांची मुले नियमित शाळेत दाखल करताना अडचणींचा डोंंगर उभा राहत आहे. यामुळे शिक्षणापासून वंचित राहून मुलांच्या शिक्षणाची पाटी फुटण्याची वेळ येत आहे. म्हणून यंदा शिक्षण विभागाने आतापासूनच ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी ‘तुम्ही निवासाची सोय करा; आम्ही जेवण, शिक्षण देतो,’ असा प्रस्ताव कारखानदारांसमोर ठेवला आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी ऊसतोडणी मजूर जिल्ह्यात पाठीवर संसार घेऊन स्थलातंरित होत असतात. आई, वडिलांसोबत शाळेला जाणारी मुलेही असतात. पुन्हा गावाकडे जाईपर्यंत संंबंधित मुले शिक्षणापासून वंचित राहतात. यामुळे सर्वशिक्षा अभियानातून ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी हंगामी शाळा सुरू केल्या जात होत्या. ज्या गावात मुले आहेत, तेथेच शाळा सुरू केली जात होती. झाडाखालीही शिक्षणाचे धडे दिले जात होते.दरम्यान, हक्काचे शिक्षण कायदा आला. त्यामुळे दोन वर्षांपासून साखरशाळेची संकल्पना बंद झाली. स्थलातंरित कुटुंबातील मुलांना नियमित शाळेत दाखल करून घेण्याची तरतूद झाली. कोणत्याही कागदपत्राची विचारणा न करता प्रवेश दिला जातो. याचा फायदा घेऊन वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील मुले नियमित शाळेत जात आहेत. परंतु, ऊसतोडणी मजुरांना ज्या गावात ऊस असेल तेथे जावे लागते. काही वेळेला प्रत्येक दिवशी गावे बदलावी लागतात. अशावेळी संंबंधित मजुरांच्या मुलांना नियमित शाळेत दाखल करणे अडचणीचे आहे. रोज नव्या शाळेत जाणे बालमनाला रुचतही नाही. मुले स्वत:हूनच शाळेकडे पाठ फिरवितात. वारंवार स्थलांतर होणाऱ्या कुटुंबांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणताना अनेक अडथळे येत आहेत. किमान हंगाम संपेपर्यंत तरी ऊसतोडणी मजुरांची मुले कारखाना स्थळावरच राहावीत, त्या मुलांच्या वसतिगृहाची सोय संबंधित कारखान्यांनी करावी, असा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे. याला प्रतिसाद देऊन गेल्या हंगामात दत्त साखर कारखान्याने वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तेथे शिक्षण विभागाने जेवण व शिक्षणाची सोय केली. यामुळे मुलांना शिक्षण घेणे सोपे झाले. यंदा अजून कामगारांच्या टोळ्याही आलेल्या नाहीत; पण शिक्षण विभाग सर्व कारखानदारांशी संपर्क साधून ऊसतोडणी मजुरांच्या शिक्षणासाठी राहण्याची सुविधा उपलब्ध करून हातभार लावावा, अशी विनंती करीत आहे.ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना नियमित शाळेत दाखल करून घेतले जात आहे. मात्र, वारंवार स्थलांतर होणाऱ्या कुटुंंबांच्या मुलांना नियमित शाळेत दाखल करून घेताना अडचणी येत असतात. यामुळे कारखान्यांनी निवासाची सोय केल्यास शिक्षण विभाग जेवण व शिक्षणाची सोय करायला तयार आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी दत्त कारखान्याने मजुरांच्या मुलांसाठी राहण्याची सुविधा उपलब्ध केली होती. सर्व कारखान्यांनी निवासासाठी सहकार्य केल्यास मुलांची सोय होणार आहे. - स्मिता गौड (शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण, कोल्हापूर)