शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आयारामांची गोची; महापुरामुळे पक्षांतरावर लागला 'ब्रेक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 16:55 IST

राष्ट्रवादी नेते बार्शीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. तर भाजपच्या महाजनादेश यात्रेत सोलापुरातील काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु, महापूर आणि त्यात महाजनादेश यात्रा रद्द झाल्याने पक्षांतरवर मोठा ब्रेक लागला आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ३० हून अधिक नेत्यांनी आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. यापैकी सर्वाधिक नेत्यांनी भाजप गाठले. परंतु, या पक्षांतराला गेल्या काही दिवसांपासून ब्रेक लागला आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे हे पक्षांतर थांबले आहे.

सांगली, कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरस्थितीच्या वेळी राजकारण करू पाहणाऱ्या राजकीय पक्षांवर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येते. भाजपच्या महाजनादेश, शिवसेनेच्या जनआशीर्वाद आणि राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा देखील महापुराच्या पार्श्वभूमीवर रोखण्यात आल्या. नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत राजकीय हालचाल करणे महाग पडू शकते, यामुळे सत्ताधारी पक्षांसह विरोधीपक्ष काळजी घेत आहे. त्यानुसार सध्या पक्षांतर थांबले आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील आणखी ५० नेते भाजपमध्ये सामील होणार असल्याचा दावा काही दिवसांपूर्वीच करण्यात आला होता. पक्षांतराचा पहिला टप्पा पार पडला असून लवकरच दुसरा टप्पा होणार आहे. या टप्प्यात किमान ५० नेते भाजप आणि शिवसेनेत येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, राज्यातील पूरस्थितीमुळे या नेत्यांनीही पक्षांतर करण्यास उसंत घेतली आहे. जेणेकरून सोशल मीडियातून आपल्यावर टीका होणार नाही. किंबहुना सत्ताधारी पक्षांकडूनही या आयारामांना सबुरीचा सल्ला दिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी नेते बार्शीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. तर भाजपच्या महाजनादेश यात्रेत सोलापुरातील काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु, महापूर आणि त्यात महाजनादेश यात्रा रद्द झाल्याने पक्षांतरवर मोठा ब्रेक लागला आहे.