शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

दुष्काळाच्या झळा; राजापुरात ६८ विहिरी, तरीही पाण्याचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 10:51 IST

सांगोला तालुक्यातील शिवारं पडलेत कोरडठाक; पाझर तलावातील विहीर केव्हाचीच आटलेली

ठळक मुद्देअंतर्गत मतभेदामुळे छावणी प्रतीक्षेतचएका टँकरद्वारे पाणीपुरवठादूध व्यवसायावर शेतकºयांचा उदरनिर्वाह

अरुण लिगाडे 

सांगोला : भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाºया राजापूर गावाच्या घशाला पडलेली कोरड कुणाचंही मन पिळवटून टाकेल, अशी आहे. ना गावाला रस्ता नीट आहे, ना कोणत्याही सिंचन योजनेतून पाणी! केवळ पावसावर शेती व पिण्याच्या पाण्याची भिस्त! शिरभावी योजनेचे पाणी आलेच नाही तर गावाला पाणी... पाणी म्हणून घशाला कोरड पडते. म्हैसाळ योजनेतून बंद पाईपद्वारे गावाला पाणी मिळाले तर गाव कायमस्वरुपी दुष्काळमुक्त होईल, पण हा सुखाचा दिवस केव्हा उगवेल, याचा खुद्द सरपंच बाबुराव तोडकरी यांनाही भरवसा नाही.

मंगळवारी दु. २ च्या सुमारास राजापूर गावाला भेट दिली असता हे वास्तव जाणवले. भीषण दुष्काळामुळे गाव परिसरातील शिवारच्या शिवार ओस पडल्याचे दिसून आले. गावातील विहिरींनी तर कधीचाच तळ गाठलेला. गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. गावातील पारावर गप्पा मारत या तरूणांचा वेळ चाललाय. महिला आपापल्या दारात गुरांना वैरण-पाणी करुन शेण-घाण काढत असल्याचे दिसून आले. पाणीच नाही तर शेतात पिकवायचे तरी काय, असा प्रश्न घरच्या ज्येष्ठांना आणि कर्त्यांना पडलेला ! सांगोला तालुक्यातील ६४० लोकसंख्येचे व १३६ कुटुंबसंख्या असलेले उंचवट्यावरील राजापूर गाव सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. सलग तीन वर्षे पावसाने हुलकावणी दिली. गावपरिसरात सुमारे ६८ विहिरी आहेत. मात्र त्या कोरड्या-ठणठणीत पडल्या आहेत. गावातील आडात पाणी नसल्यामुळे आता त्याचा वापर केरकचºयासाठी होत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी पाझर तलावातील विहिरीवर सर्वांच्याच आशा. मात्र या विहिरीनेही केव्हाचाच दम सोडलाय.

अंतर्गत मतभेदामुळे छावणी प्रतीक्षेतच- चालू वर्षी भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांचा चारा व पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झालाय़ शेतकरी पशुधन कसे जगवायचे या विवंचनेत असून महागडा चारा आणून पशुधन जगविणे सुरू आहे. तालुक्यात सर्वत्र जनावरांच्या छावण्या सुरु झाल्या असल्या तरी राजापूर गावात अंतर्गत मतभेदामुळे जनावरांची छावणी प्रतीक्षेत आहे. राजापूर गावाचा म्हैसाळ योजनेत समावेश करुन बंद पाईपद्वारे गावाला पाणी मिळावे, अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षक सुखदेव कदम यांनी केली आहे.

एका टँकरद्वारे पाणीपुरवठा- गावातील दहा हातपंपांपैकी पुजारी वस्ती व कदम वस्ती येथील हातपंप चालू स्थितीत आहेत तर राजापूर गावांतर्गत पुजारवस्ती व तोडकरी वस्तीला एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.

दूध व्यवसायावर शेतकºयांचा उदरनिर्वाह- गावातील ११०० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ५० एकरांवर डाळिंबाची लागवड आहे, त्याही बागा पाण्याअभावी जळालेल्या अवस्थेत उभ्या आहेत. केवळ पावसाच्या पाण्यावर खरीप व रब्बी हंगामातील ज्वारी, बाजरी, मका हीच मुख्य पिके घेतली जातात. मात्र पाऊसमान कमी झाल्यामुळे शेती व्यवसाय पुरता अडचणीत सापडल्याने गावातील प्रत्येक जण दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे. गतवर्षी पावसाअभावी खरीप व रब्बी हंगामातील पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी बाहेरुन ४ हजार रूपये टनाने ओले मकवान, ऊस तर ३ हजार रूपये शेकडा दराने कडबा आणून दुभती जनावरे जगवली जात आहेत. त्यामुळे गावात दररोज सकाळ-संध्याकाळचे २५०० लिटर दूध संकलित होत असल्याने  या व्यवसायावरच शेतकºयांचा उदरनिर्वाह सुरु आहे.

राजापूर गावाला जोडणाºया चोहोबाजूंच्या रस्त्याची दुरुस्ती न केल्यामुळे ग्रामस्थांना या खडतर रस्त्यावरुनच प्रवास करावा लागतो, हे गावाचे दुर्दैव आहे.- ऋषीकेश पाटील, उपसरपंच

राजापूर गावाला पाणी फाउंडेशनकडून १ लाख रूपयांचे बक्षिस मिळाल्याने त्या पैशातून जलसंधारणाची कामे सुरु आहेत तर नरेगामधून बांधबंदिस्तीच्या कामावर ४० मजूर काम करीत आहेत.- बाबुराव तोडकरी, सरपंच

सन १९७६ ते १९९२ या कालावधीत गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी कोणतेही साधन नसताना गावाशेजारील असणाºया बाबासाहेब तोडकरी यांच्या विहिरीतून त्याकाळी अख्ख्या गावाला पाणीपुरवठा व्हायचा. परंतु पाऊसच नसल्याने आज ही विहीर कोरडी ठणठणीत पडली आहे.- समाधान राजमाने, ग्रामस्थ

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईTemperatureतापमान