शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पश्चिम महाराष्ट्रात ओला दुष्काळ, मराठवाडा कोरडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 10:59 IST

राज्यातील एका भागामधे जलसंकट घोंगावत असून, मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर विभागात मात्र वर्षभराची पाण्याची बेगमी होईल की नाही याची चिंता आहे.

ठळक मुद्देओला-सुका दुष्काळाचा खेळ : औरंगाबाद-अमरावती, नागपूर विभागात जेमतेम पाणी

पुणे : पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पाच जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, मराठवाड्यातील औरंगाबाद, अमरावती विभागांत पाण्याचा ठणठणाट असून, विदर्भातील नागपूर विभागामधे देखील पाणीबाणीची स्थिती आहे. अमरावतीमधे अवघा १८ टक्के पाणीसाठा आहे. कोकण, पुणे आणि नाशिक वगळता राज्यातील अनेक मोठ्या धरणांत अजूनही क्षमतेच्या निम्माही पाणीसाठा झालेला नाही.मॉन्सूनचा दोन महिन्यांचा काळ लोटला तरी मराठवाडा आणि विदर्भातील धरणात पुरेसा साठा नाही.

राज्याच्या दुसऱ्या भागामधे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यामधे दोन महिन्यांतच मॉन्सूनची सरासरी पार केली आहे. अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील सर्वात मोठे असलेले उजनी धरण (११७.४७ टीएमसी) पूर्ण क्षमतेने भरले आहे. उजनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने पंढरपुरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. राज्यातील एका भागामधे जलसंकट घोंगावत असून, मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर विभागात मात्र वर्षभराची पाण्याची बेगमी होईल की नाही याची चिंता आहे. जुलैच्या अखेरीपर्यंत औरंगाबाद विभागात क्षमतेच्या अवघा पाऊण टक्के साठा येथील धरणांत होता. नाशिकमधे झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे जायकवाडी (पैठण) धरणात क्षमतेच्या ६५ टक्के साठा झाला आहे. जवळपास ७७ टीएमसी पाणी जायकवाडीत जमा झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुप्पट साठा आहे. औरंगाबाद विभागाचा विचार केल्यास तेथे क्षमतेच्या अवघा २१.९४ टक्केच साठा आहे. पैठण वगळता औरंगाबाद विभागातील बीडमधील मांजरा, हिंगोलीचे येलदरी, सिद्धेवर, नांदेडचे निम्म मनार, उस्मानाबादचा सिना, तेरणा आणि परभणीच्या दुधना प्रकल्पामधे पाण्याचा अक्षरश: खडखडाट आहे.राज्यातील विभागनिहाय पाणीसाठा (टीएमसीमध्ये)विभाग       एकूण          एकूण        आजचा                       टक्केवारी           उपयुक्त साठा    साठा         उपयुक्त साठाअमरावती    १४८.०६     १७६.३५      २७.३८                           १८.८औरंगाबाद    २६०.३१    ३२५.८२       ५७.११                           २१.९४कोकण        १२३.९४     १२९.६४      १०४.९९                        ८४.७१नागपूर       १६२.६७      १९७.०१       ४९.१७                        ३०.२३नाशिक       २१२            २४३.२३      १०९.६६                     ५१.७३पुणे            ५३७.१२       ६७४.९२       ४४४.७५                   ८२.८एकूण        १४४४.१३     १७१९.८२     ७९३                        ५४.९५

अमरावती विभागातही तीच स्थिती आहे. तेथे अवघा २२ टक्के पाणीसाठा आहे. अकोल्यातील वाणमधे क्षमतेच्या निम्मा, बुलडाण्याच्या पेनटाकळीमधे ४२ टक्के, यवतमाळच्या बेंबळा प्रकल्पात १८.२७ टक्के पाणसाठा आहे. या प्रकल्पातील मोठ्या प्रकल्पांमधेच पाणी नसल्याने येथेही वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. नागपूर विभागातील भंडारा जिल्ह्यातील गोसी खुर्द या मोठ्या प्रकल्पात ४४ टक्के पाणीसाठा असून, गोंदियातील इटियाडोहला ५१ आणि निम्न वर्धा येथे २१ टक्के पाणीसाठा आहे. चंद्रपूरमधील ओसाळमेंढा पूर्ण क्षमतेने भरला आहे. नागपूरमधील तोतलाडोह या मोठ्या प्रकल्पात अवघा ०.१ टक्के साठा असून, विभागातील इतर ठिकाणी सरासरी पंचवीस ते तीस टक्केच पाणी आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसdroughtदुष्काळFarmerशेतकरीweatherहवामान