शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

डीपीसीत लवकरच सुधारणा करणार; काही योजना गाळणार, काही योजनांचा नव्याने समावेश होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 13:05 IST

गेल्यावर्षी ३६ जिल्ह्यांना डीपीसीमार्फत जवळपास साडेअठरा हजार कोटी रुपये देण्यात आले...

मुंबई : जिल्हा नियोजन समित्यांना (डीपीसी) आजवर हजारो कोटी रुपये विविध योजना आणि कामांसाठी वितरित करण्यात आले; पण या निधीची फलनिष्पत्ती काय याचे मूल्यमापन आता करण्यात येणार आहे आणि त्या आधारे काही बदल केले जातील, अशी माहिती वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी ‘लोकमत’ला दिली.

गेल्यावर्षी ३६ जिल्ह्यांना डीपीसीमार्फत जवळपास साडेअठरा हजार कोटी रुपये देण्यात आले. उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी अलिकडेच आपल्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक जयस्वाल यांच्यासह घेतली. त्यावेळी डीपीसीतील निधीच्या अपव्ययाबद्दल चर्चा झाली. डीपीसीतील योजनांचे मूल्यमापन, संनियंत्रण करण्यासाठी वेगळा निधी राखून ठेवलेला असतो पण असे मूल्यमापनच अनेक जिल्ह्यांमध्ये केले जात नाही, ही बाब बैठकीमध्ये प्रकर्षाने समोर आली. आता हे मूल्यमापन केले जाणार आहे.

निधीचा अपव्यय आणि गैरव्यवहारांवर नियंत्रण २०२५-२६ साठी डीपीसीमार्फत ३६ जिल्ह्यांना २० हजार कोटी रुपयांहून अधिकचा निधी दिला जाणार आहे. अजित पवार यांनी राज्याला आर्थिक शिस्त लावणे गरजेचे आहे असे आधीच म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर निधीच्या अपव्यय आणि गैरव्यवहारांवर नियंत्रण आणले जाणार आहे. डीपीसीतून  दलित वस्ती सुधारणेची कामे हजारो कोटी रुपयांची कामे आजवर झाली पण पुन्हा तीच ती कामे त्याच त्या ठिकाणी केली जातात, हा प्रकार आता रोखला जाणार आहे. अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी काही नवीन निर्णय प्रस्तावित आहेत. या प्रवर्गातील नागरिकांना घर दुरुस्तीसाठी अनुदान देणे, ज्यांच्याकडे घर नाही त्यांना रमाई योजनेतून घर देणे, मातंग, मांग-गारुडी, खाटिक समाजासाठी व्यवसायाकरता किंवा पर्यायी स्वयंरोजगारासाठी स्वतंत्र योजना, या प्रवर्गातील विधवा, परितक्त्या, घटस्फोटित, एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना,अनुसूचित जातींच्या शेतकरी गटांसाठी स्वतंत्र योजना, बेरोजगारांसाठी स्वयंरोजगाराची योजना अमलात आणण्याचा विचार असल्याचे राज्यमंत्री जयस्वाल यांनी सांगितले.

कामगिरीनुसार निधी nविविध ग्रामपंचायतींना निधी देताना कामगिरीनुसार (परफॉर्मन्स बेस्ड्) निधी देण्याचे प्रस्तावित आहे. nत्यानुसार, विविध सरकारी योजनांची पारदर्शक आणि परिणामकारक अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर निधी देण्यात येईल.

मूल्यमापनाच्या आधारे डीपीसीतील अनावश्यक योजनांना कात्री लावून नवीन योजनांचा समावेश करण्यात येईल. संपूर्ण राज्यासाठी योजनांची एकच यादी करण्यापेक्षा जिल्हानिहाय गरजांनुसार योजना व कामे निश्चित केली जातील. - आशिष जयस्वाल, राज्यमंत्री - वित्त व नियोजन 

टॅग्स :Ashish Jaiswalआशीष जयस्वाल