शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

डबलडेकर रेल्वे पुन्हा होणार सुरु

By admin | Updated: February 18, 2015 23:48 IST

नीलेश राणेंचे प्रयत्न : रेल्वेच्या समस्यांविरोधात लढा कायम राहणार

रत्नागिरी : अनेक समस्यांच्या गर्तेत कोकण रेल्वे सापडली असतानाच, नागरी सत्कार स्वीकारण्यासाठी येणाऱ्या केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासमोर माजी खासदार नीलेश राणेंनी काळे झेंडे दाखवून आंदोलन केले होते. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून, कोकण रेल्वे प्रशासनाने कोकणात पुन्हा एकदा डबल डेकर रेल्वे सुरु केली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना नीलेश राणे यांनी सांगितले की, कोकणातील जनतेच्या कोकण रेल्वे संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी लढा सुरुच ठेवणार आहे. दोन दशकांचा कालावधी होत असतानाही अद्याप कोकण रेल्वेच्या समस्या संपलेल्या नाहीत, तर त्या अधिकाधिक वाढत आहेत. मुंबईतील चाकरमान्यांना चांगला पर्याय असतानाही, कोकण रेल्वेचे दुपरीकरण अद्यापही रखडलेले आहे. हायस्पीड रेल्वे किंवा बुलेट ट्रेन कोकणसाठी स्वप्नच ठरले असून, अनेक गाड्यांना अद्यापही महत्त्वाच्या ठिकाणी थांबे नाहीत. राजापूर तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्थानक अद्यापही प्रलंबित आहे. तसेच गणपती उत्सवाच्या दरम्यान सुरु केलेली डबलडेकर रेल्वे ही अवघ्या तीन महिन्यात बंद करण्यात आली. ती डबलडेकर दक्षिणेकडेही गेली. गतवर्षी दसरा दिवाळीच्या सुमारास या डबलडेकरने ३० फेऱ्यांमधून तब्बल १ कोटी २६ लाख एवढे उत्पन्न मिळवले होते. याच कालावधीत सुमारे २१ हजार प्रवाशांनी या डबलडेकरने प्रवास केला. कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या या डबल डेकर गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी यासह थिवीम येथे थांबे देण्यात आले होते. ही डबलडेकर बंद झाल्यानंतर प्रवाशांमधून निराशा व्यक्त झाली. नेहमीच कोकण रेल्वेने कोकणावर अशा प्रकारे अन्याय केला. डबलडेकर रेल्वे गाडीसह अन्य मुद्दे घेऊन माजी खासदार नीलेश राणे यांनी जनतेच्या भल्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आणि सुरेश प्रभू यांच्या रत्नागिरी दौऱ्यामध्ये निदर्शने केली. याशिवाय, कोकण रेल्वेतील प्रवाशांची लूट, रेल्वे अपघातांमध्ये होत असलेली वाढ, प्रवाशांची सुरक्षितता हे ठळक मुद्देही नीलेश राणे यांनी या आंदोलनाच्या निमित्ताने प्रकाशात आणले. नीलेश राणे यांनी केलेल्या या आंदोलनाचा परिणाम म्हणून कोकण रेल्वे प्रशासनाने नमते घेत डबलडेकर गाडी पुन्हा सुरु केली आहे. याबाबत प्रतिक्रया देताना, नीलेश राणे यांनी सांगितले की, कोकण रेल्वेच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलन करणे आवश्यक असेल, तर ते जनतेसाठी मी करेन. पण, कोकणी जनतेवर होणारा अन्याय खपवून घेणार नाही. कोकण रेल्वेची एक समस्या सुटली आहे, पण आणखी बऱ्याच समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी मी माझा लढा सुरूच ठेवणार, असे मत नीलेश राणे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)दोन दशकानंतरही कोकण रेल्वेच्या समस्या संपलेल्या नाहीत : नीलेश राणेंचे मत.कोकण रेल्वेचे दुपदरीकरणही रखडले, हायस्पीड रेल्वे, बुलेट ट्रेन हे कोकणसाठी स्वप्नच : राणेकोकणी जनतेवरील अन्याय खपवून न घेण्याचा नीलेश राणे यांनी दिला इशारा.