शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

अखेर दारे उघडणार; ज्ञानाची ४ ऑक्टोबर, तर देवाची ७ ऑक्टोबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 06:30 IST

पालक संघटना, शिक्षण तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याची भूमिका मांडली होती. मुलांच्या भावनिक वाढीच्या दृष्टीनेही प्रत्यक्ष शाळा सुरू करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी राज्य शासनास दिले होते. 

मुंबई : राज्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर धार्मिक स्थळे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून, तर ज्ञानाची मंदिरं असणाऱ्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी हे निर्णय जाहीर केले. मंदिरांच्या कळस दर्शनावर गेली कित्येक महिने समाधान मानाव्या लागणाऱ्या भक्तांना, तसेच शाळा उघडण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे.

पालक संघटना, शिक्षण तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याची भूमिका मांडली होती. मुलांच्या भावनिक वाढीच्या दृष्टीनेही प्रत्यक्ष शाळा सुरू करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी राज्य शासनास दिले होते. 

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शाळा उघडण्याचा निर्णय घेतला. ऑगस्टमध्ये शाळा सुरू करण्याचा एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, राज्यात तिसरी लाट येण्याच्या भीतीने तो स्थगित झाला. तथापि, आता गणेशोत्सवानंतर रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात कुठेही वाढ झालेली दिसली नाही. 

उलट रूग्णसंख्या कमी होत आहे. राज्याचा रूग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के असून बहुतांश लोकांचे लसीकरण झाले आहे. शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी आधीपासूनच प्रयत्न करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जुलैमध्ये कोरोनामुक्त ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. 

मुलांना उपस्थिती बंधनकारक नाहीमुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल. विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक नसेल तसेच  शाळेत येण्याची सक्ती करण्यात येणार नाही. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य राहील. 

खेळांना मात्र बंदीशाळा सुरू होतील, पण सध्याच कोणतेही खेळ घेता येणार नाहीत, असे शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर काही खेळ घेण्यास हरकत नसेल. तथापि, जवळून संबंध येईल असे खेळ जसे खो-खो, कबड्डी हे टाळले जातील. 

भाविकांची इच्छापूर्तीधार्मिक स्थळे कधी उघडणार याबाबत उत्सुकता होती. अखेर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त साधत सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी समस्त भाविकांची इच्छापूर्ती केली आहे. धार्मिक स्थळे खुली करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासन येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर करण्याची शक्यता आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करूनच धार्मिक स्थळे खुली करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

‘या’ विद्यार्थ्यांची घेणार विशेष काळजी- शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या मनोवस्थेत बदल झाला असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विभागाने विद्यार्थ्यांची मानसिक काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

- वर्गात शांत बसणारे, कोणत्याही गोष्टीत स्वारस्य न दाखविणारे, जास्त चिडचिड करणारे, रागीट व छोट्याशा गोष्टीने निराश होणारे, वयाशी विसंगत वर्तणूक करणारे, खाण्याच्या व झोपण्याच्या सवयींमध्ये बदल दर्शविणारे, असहाय्य व सतत रडणारे अशा विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्यात येईल. 

अशा आहेत मार्गदर्शक सूचना -- एखादा विद्यार्थी आजारी असेल, त्याला आजाराची लक्षणे दिसत असतील तर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. - मुलांना गणवेशाची सक्ती नसेल. घरच्या कपड्यांवरही शाळेत जाता येईल.- प्रत्येक शाळेत शक्य असल्यास हेल्थ क्लिनिक. विद्यार्थ्यांचे तापमान नियमितपणे तपासावे.- इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घ्यावी. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. मुलांना शाळेत पायी येण्यासाठी प्रोत्साहित करावे.- ज्या शाळांमध्ये स्कूलबस, खासगी वाहनांद्वारे विद्यार्थी येतात, अशा वाहनांमध्ये एका सिटवर एकच विद्यार्थी प्रवास करेल याची दक्षता घ्यावी. - सॅनिटायझरचा वापर करावा. - विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाइन सादर करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची अदलाबदल होणार नाही.- गृहपाठ शक्यतो वर्गामध्येच करून घ्यावा. मुलांना कमीतकमी पुस्तके/वह्या आणाव्या लागतील, अशी व्यवस्था असावी, असे सांगण्यात आले आहे.- सीएसआर फंडांतून शाळांनी पंखे, सॅनिटायझर, वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करावीत. अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. 

टॅग्स :SchoolशाळाState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेStudentविद्यार्थीTeacherशिक्षक