शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

अखेर दारे उघडणार; ज्ञानाची ४ ऑक्टोबर, तर देवाची ७ ऑक्टोबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 06:30 IST

पालक संघटना, शिक्षण तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याची भूमिका मांडली होती. मुलांच्या भावनिक वाढीच्या दृष्टीनेही प्रत्यक्ष शाळा सुरू करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी राज्य शासनास दिले होते. 

मुंबई : राज्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर धार्मिक स्थळे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून, तर ज्ञानाची मंदिरं असणाऱ्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी हे निर्णय जाहीर केले. मंदिरांच्या कळस दर्शनावर गेली कित्येक महिने समाधान मानाव्या लागणाऱ्या भक्तांना, तसेच शाळा उघडण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे.

पालक संघटना, शिक्षण तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याची भूमिका मांडली होती. मुलांच्या भावनिक वाढीच्या दृष्टीनेही प्रत्यक्ष शाळा सुरू करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी राज्य शासनास दिले होते. 

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शाळा उघडण्याचा निर्णय घेतला. ऑगस्टमध्ये शाळा सुरू करण्याचा एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, राज्यात तिसरी लाट येण्याच्या भीतीने तो स्थगित झाला. तथापि, आता गणेशोत्सवानंतर रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात कुठेही वाढ झालेली दिसली नाही. 

उलट रूग्णसंख्या कमी होत आहे. राज्याचा रूग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के असून बहुतांश लोकांचे लसीकरण झाले आहे. शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी आधीपासूनच प्रयत्न करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जुलैमध्ये कोरोनामुक्त ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. 

मुलांना उपस्थिती बंधनकारक नाहीमुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल. विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक नसेल तसेच  शाळेत येण्याची सक्ती करण्यात येणार नाही. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य राहील. 

खेळांना मात्र बंदीशाळा सुरू होतील, पण सध्याच कोणतेही खेळ घेता येणार नाहीत, असे शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर काही खेळ घेण्यास हरकत नसेल. तथापि, जवळून संबंध येईल असे खेळ जसे खो-खो, कबड्डी हे टाळले जातील. 

भाविकांची इच्छापूर्तीधार्मिक स्थळे कधी उघडणार याबाबत उत्सुकता होती. अखेर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त साधत सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी समस्त भाविकांची इच्छापूर्ती केली आहे. धार्मिक स्थळे खुली करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासन येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर करण्याची शक्यता आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करूनच धार्मिक स्थळे खुली करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

‘या’ विद्यार्थ्यांची घेणार विशेष काळजी- शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या मनोवस्थेत बदल झाला असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विभागाने विद्यार्थ्यांची मानसिक काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

- वर्गात शांत बसणारे, कोणत्याही गोष्टीत स्वारस्य न दाखविणारे, जास्त चिडचिड करणारे, रागीट व छोट्याशा गोष्टीने निराश होणारे, वयाशी विसंगत वर्तणूक करणारे, खाण्याच्या व झोपण्याच्या सवयींमध्ये बदल दर्शविणारे, असहाय्य व सतत रडणारे अशा विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्यात येईल. 

अशा आहेत मार्गदर्शक सूचना -- एखादा विद्यार्थी आजारी असेल, त्याला आजाराची लक्षणे दिसत असतील तर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. - मुलांना गणवेशाची सक्ती नसेल. घरच्या कपड्यांवरही शाळेत जाता येईल.- प्रत्येक शाळेत शक्य असल्यास हेल्थ क्लिनिक. विद्यार्थ्यांचे तापमान नियमितपणे तपासावे.- इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घ्यावी. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. मुलांना शाळेत पायी येण्यासाठी प्रोत्साहित करावे.- ज्या शाळांमध्ये स्कूलबस, खासगी वाहनांद्वारे विद्यार्थी येतात, अशा वाहनांमध्ये एका सिटवर एकच विद्यार्थी प्रवास करेल याची दक्षता घ्यावी. - सॅनिटायझरचा वापर करावा. - विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाइन सादर करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची अदलाबदल होणार नाही.- गृहपाठ शक्यतो वर्गामध्येच करून घ्यावा. मुलांना कमीतकमी पुस्तके/वह्या आणाव्या लागतील, अशी व्यवस्था असावी, असे सांगण्यात आले आहे.- सीएसआर फंडांतून शाळांनी पंखे, सॅनिटायझर, वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करावीत. अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. 

टॅग्स :SchoolशाळाState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेStudentविद्यार्थीTeacherशिक्षक