शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Chandrakant Patil: “माजी मंत्री म्हणू नका...”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या दाव्याने भुवया उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 15:43 IST

देहू येथील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी जाहीर कार्यक्रमात जे विधान केले त्यावरुन तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

पुणे – राज्यात भाजपा नेते अनेकदा काही दिवस थांबा, महाविकास आघाडी सरकार स्वत: कोसळेल. राज्यात पुन्हा भाजपाचं सरकार लवकरच येईल असा दावा करत आले आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेतेही आमचं सरकार ५ वर्ष चालेल. कुणीही हे सरकार पाडू शकत नाही असं प्रतिदावा करत आहे. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा सूचक दावा केला आहे.

देहू येथील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी जाहीर कार्यक्रमात जे विधान केले त्यावरुन तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यात एकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल असं विधान केल्याने नेमकं चंद्रकांतदादांना काय सूचित करायचं आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. या तिन्ही पक्षात अंतर्गत वाद असला तरी उघडपणे कुणीही भाष्य करत नाही. त्यात चंद्रकांत पाटलांनी २-३ दिवसांत कळेल हे विधान केल्याने नेमकं काय घडेल हे पाहणं उत्सुकतेचे आहे.

काही महिन्यांपूर्वी भाजपा स्बळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करत आहे. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी राजकीय गणितंही मांडली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने राज्यात स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपाला १२२ जागा जिंकण्यात यश मिळाले होते. तर २०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपा यांनी युती करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपाला १०५ जागा जिंकता आल्या होत्या. त्यानंतर पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय झाला. महाराष्ट्रामध्ये सध्या भाजपाचे १०६ आमदार असूनही आपली मते आहेत १ कोटी ४२ लाख. १ कोटी ७० लाख मतं ज्याला मिळतात त्याला स्वबळावर सरकार स्थापन करता येते. एकट्याच्या ताकदीवर १४० जागा जिंकायच्या असतील १ कोटी ७० लाख मतं आवश्यक  आहेत. आपण काय म्हणतोय की २५ डिसेंबरपर्यंत दोन कोटी लोकांना भाजपाचं सदस्य करायचं. मग १४० येतील की जास्त येतील. १ कोटी ७० लाखाला १४० जागा येतात. ३० लाख अधिक झाले. महाराष्ट्रामध्ये एकट्याने सरकार आणायचे असेल तर हे अभियान यशस्वी करावे लागेल असं त्यांनी म्हटलं होतं.

संभाजी ब्रिगेडसोबत युतीचं ऑफर काय ते पाहू

'पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून भाजपासोबत युतीची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. खेडेकरांची ऑफर काय आहे, हे आधी बघू आणि नंतर ठरवू. भाजपा एका व्यक्तीचा पक्ष नाही. खेडेकरांकडून प्रस्ताव आला नाही आल्यावर कोअर कमिटीत बसून निर्णय घेऊ अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस