शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

छोट्या पक्षांचे मर्यादित स्थान लक्षात घेता मतविभाजनाचे काम करू नका - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 05:22 IST

जिथे मर्यादित स्थान आहे तिथे मत विभाजनाचे काम काँग्रेसने करू नये, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी छोट्या पक्षांना जागा वाटपात महत्त्वाचे स्थान द्या, असे सुचविले आहे.

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला पर्याय देण्याची महत्त्वाची भूमिका काँग्रेसने बजावली. आम्हा सगळ्यांचे स्थान मर्यादित आहे. जिथे मर्यादित स्थान आहे तिथे मत विभाजनाचे काम काँग्रेसने करू नये, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी छोट्या पक्षांना जागा वाटपात महत्त्वाचे स्थान द्या, असे सुचविले आहे.राहुल गांधींबाबत टिंगल टवाळी मोहीम राबविली गेली. ते चार टर्म संसदेत आहेत, ते आता लोकांना पसंत पडले आहेत. सत्ताधाऱ्यांनी पैशाचा वापर केला, त्याचा परिणाम जनमानसावर झाला नाही. काँग्रेस पक्षाने नव्या पिढीकडे नेतृत्व सोपवले, ते लोकांनी स्वीकारले. तिसरी आघाडी किंवा युपीए ३ असे काही नाही पण देशपातळीवरील प्रश्नांसाठी आपापसातील मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे, असेही पवार म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शोभा राखली पाहिजे. ऑगस्टा प्रकरणात कोणाला पकडून आणता आणि धमक्या देता. हे त्या पदावरील व्यक्तीला शोभत नाही, अशी टीका त्यांनी केली. पवार म्हणाले, मोदींबद्दल लोकांची नाराजी मतांमधून व्यक्त झाली आहे. देशातील संस्थांवर झालेला हल्ला लोकांना पटला नाही. देशात सध्या काळजी करण्यासारखे वातावरण आहे. भाजपा सरकारच्या कामाबद्दल जनता नाराज आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. एका कुटुंबाविरुद्ध त्यांनी सतत प्रचार केला. त्यांनी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधींचे काम पाहिले नाही. फक्त गेल्या दहा वर्षांच्या कामावर सतत टीका केली. त्यांनी सोनिया आणि राहुल गांधींना लक्ष्य केले, ते लोकांना पटले नाही. हा चार राज्यांचा प्रश्न नाही तर यापुढे लोकांना जेथे संधी मिळेल तेथे देशातील चित्र बदललेले दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस