शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

छोट्या पक्षांचे मर्यादित स्थान लक्षात घेता मतविभाजनाचे काम करू नका - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 05:22 IST

जिथे मर्यादित स्थान आहे तिथे मत विभाजनाचे काम काँग्रेसने करू नये, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी छोट्या पक्षांना जागा वाटपात महत्त्वाचे स्थान द्या, असे सुचविले आहे.

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला पर्याय देण्याची महत्त्वाची भूमिका काँग्रेसने बजावली. आम्हा सगळ्यांचे स्थान मर्यादित आहे. जिथे मर्यादित स्थान आहे तिथे मत विभाजनाचे काम काँग्रेसने करू नये, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी छोट्या पक्षांना जागा वाटपात महत्त्वाचे स्थान द्या, असे सुचविले आहे.राहुल गांधींबाबत टिंगल टवाळी मोहीम राबविली गेली. ते चार टर्म संसदेत आहेत, ते आता लोकांना पसंत पडले आहेत. सत्ताधाऱ्यांनी पैशाचा वापर केला, त्याचा परिणाम जनमानसावर झाला नाही. काँग्रेस पक्षाने नव्या पिढीकडे नेतृत्व सोपवले, ते लोकांनी स्वीकारले. तिसरी आघाडी किंवा युपीए ३ असे काही नाही पण देशपातळीवरील प्रश्नांसाठी आपापसातील मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे, असेही पवार म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शोभा राखली पाहिजे. ऑगस्टा प्रकरणात कोणाला पकडून आणता आणि धमक्या देता. हे त्या पदावरील व्यक्तीला शोभत नाही, अशी टीका त्यांनी केली. पवार म्हणाले, मोदींबद्दल लोकांची नाराजी मतांमधून व्यक्त झाली आहे. देशातील संस्थांवर झालेला हल्ला लोकांना पटला नाही. देशात सध्या काळजी करण्यासारखे वातावरण आहे. भाजपा सरकारच्या कामाबद्दल जनता नाराज आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. एका कुटुंबाविरुद्ध त्यांनी सतत प्रचार केला. त्यांनी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधींचे काम पाहिले नाही. फक्त गेल्या दहा वर्षांच्या कामावर सतत टीका केली. त्यांनी सोनिया आणि राहुल गांधींना लक्ष्य केले, ते लोकांना पटले नाही. हा चार राज्यांचा प्रश्न नाही तर यापुढे लोकांना जेथे संधी मिळेल तेथे देशातील चित्र बदललेले दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस