शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जगण्याचा आमचा हक्क नाकारू नका

By admin | Updated: October 3, 2016 01:46 IST

मी माझ्या उमेदीच्या वयात रस्त्यावरचे झेब्रा क्रॉसिंग रंगवून पैसे कमावले, आणि शिक्षण पूर्ण केले.

पुणे : मी माझ्या उमेदीच्या वयात रस्त्यावरचे झेब्रा क्रॉसिंग रंगवून पैसे कमावले, आणि शिक्षण पूर्ण केले. आपण कुणाला नको आहोत, ही जाणीव अतिशय न्यूनगंड निर्माण करणारी असते. उच्चभ्रू वृत्तीला छेद देणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नसतो का? प्रत्येक गोष्ट आम्हाला भांडून का मिळवावी लागते? माणसे म्हणून जगण्याचा आमचा हक्क नाकारू नका, असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते, नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी आज येथे काढले.शहरी व ग्रामीण भागातील वसाहतींच्या विकासाशी निगडित समन्वय साधणाऱ्या हॅबिटॅट फोरम (इनहॅप) या संस्थेने पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने ‘संघर्ष आणि सामर्थ्य : शहरातील श्रमजीवींच्या कथा’ हे पुस्तक तयार केले आहे. त्याचे प्रकाशन पाटेकर यांच्या हस्ते झाले. महापौर प्रशांत जगताप, इनहॅप संघटनेचे अध्यक्ष कीर्ती शहा, पालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, जाणीव संघटनेचे अध्यक्ष विलास चाफेकर, अंगणवाडी कर्मचारी सभा अध्यक्ष नितीन पवार, कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतच्या सुरेखा गाडे, दगडखाण कामगार विकास परिषदेचे संजय संख्ये, हमाल पंचायतचे नवनाथ बिनवडे आदी व्यासपीठावर होते.हमाल पंचायत, अंगणवाडी कर्मचारी सभा, जाणीव संघटना, कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत, रिक्षा पंचायत, दगडखाण कामगार विकास परिषद अशा ६ संघटनांच्या सदस्यांच्या संघर्षाची कथा यात आहे. कीर्ती शहा म्हणाल्या, श्रमिकांच्या विकासासाठी, सन्मानासाठी, हक्कांसाठी होणाऱ्या संघर्षाची कथा यामध्ये आहे. गरिबांना समजावून घेणारी, त्यांच्या संवेदनांशी एकरूप होणारी शहरे या देशामध्ये असली पाहिजेत. महापौर जगताप यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मोळक, चाफेकर, पवार, गाडे यांनी मनोगत व्यक्त केले. कष्टकऱ्यांच्या प्रतिनिधींचा पाटेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नीता पवार यांनी आभार मानले.>सर्वात प्रथम देश महत्त्वाचा त्यानंतर आम्ही कलाकार. देशात कलाकार खटमल एवढे आहेत. देशापुढे आमची किंमत शून्य आहे. आपल्या देशाचे जवान हेच खरे हिरो आहेत. त्यांच्याप्रति कोणाला आदर नसेल तर त्यांचा आपण आदर करू नये. सीमेवर युद्ध नसते तेव्हा तेथे एकमेकांत भाईचारा असतो. युद्ध असल्यावर एकमेकांना गोळ्या माराव्या लागतात. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना आत्ता काम देऊ नये. परिस्थिती निवळल्यावर त्यांनी पुन्हा येण्याबाबतचा निर्णय सरकारचा असेल, असे बजावून पाटेकर यांनी, आम्ही बोलतो त्याकडे लक्ष देऊ नका. तसेच, ज्यांची लायकी नाही अशांना महत्त्वही देऊ नका, अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सलमान खानने पाक कलाकारांना काम दिले पाहिजे असे वक्तव्य केले होते, त्यावर पाटेकर म्हणाले, सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा दिलेला नाही.