शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

लिपींमधील वैविध्य ही लिपीरहित भाषांची खरी समस्या

By admin | Updated: February 28, 2017 02:27 IST

विविध लिपींच्या जास्तीत जास्त वापरामुळे लिपीरहित भाषांचे साहित्यिक स्थान अधिक खालावत चालले असल्याची भावना साहित्यिकांनी व्यक्त केली.

मुंबई : विविध लिपींच्या जास्तीत जास्त वापरामुळे लिपीरहित भाषांचे साहित्यिक स्थान अधिक खालावत चालले असल्याची भावना साहित्यिकांनी व्यक्त केली. सोमवारी एलआयसी लिटफेस्टचे तिसरे सत्र संपन्न होत असताना, भारतीय भाषांमधील साहित्य व वाङ्मयाला लिपींच्या लक्ष्मणरेषेने दुभाजू नये, असेही मत या वेळी साहित्यिकांनी व्यक्त केले. जाती व धर्म भिन्न असले, तरीही माणुसकी आणि वाङ्मय मात्र एकसंधच आहे, यावर सर्व सहभागी साहित्यिकांचे एकमत झाले. भाषा, विशेषत: पारंपरिक बोलीभाषा हा संस्कृतींशी जोडणारा समान धागा असून, या बोलीभाषांचे जतन करणे सर्वांत महत्त्वाचे आहे. दोन दिवस रंगलेल्या या साहित्यिक मेळाव्यात भारतीय प्रादेशिक भाषांतील प्रसिद्ध व नवोदित लेखक-साहित्यिकांची मांदियाळी जमली होती. ‘भारतीय साहित्याचा आधुनिक चेहरा’ या विषयावरील चर्चासत्रात सर्व साहित्यिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. कोकणीसारख्या बोलीभाषांच्या लिपीची रचना ही खरी समस्या नसून, लिपींमधील वैविध्य व त्यांचा प्रचंड मोठा समुदाय, ज्यामुळे प्रत्येक लिपीची स्वतंत्र ओळखच पुसली जाते. ही खरी समस्या बनली असल्याचे मत, ‘लिपीरहित भाषा - इतर भाषांच्या लिपी वापरणाऱ्या भाषांपुढील आव्हाने’ या चर्चासत्रात विविध भाषिक लेखकांनी व्यक्त केले. या सत्राचे अध्यक्षपद भूषवणारे खासी लेखक डेसमंड खमार्वाफ्लांग म्हणाले, इतर भाषांच्या लिपी वापरताना त्या भाषा हाताळण्याचे कामच फार जिकिरीचे होऊन जाते. आसाम आणि मेघालय येथे बहुसंख्य लोकांच्या रोजच्या वापरातील खासी या भाषेची लिपी मात्र, फारच दुर्मीळ आहे. बऱ्याच कालावधीसाठी ही भाषाच मुळापासून लुप्त झाली होती. वेल्श मिशनरींनी १८४१ मध्ये रोमन लिपीमध्ये ही भाषा लिहीण्याचा प्रयत्न करून, तिला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयास केला. हा सराव आजपर्यंत सुरू राहिल्यामुळे ही भाषा आजही जिवंत आहे.भोजपुरी ही आधुनिक भाषा आहे, या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेताना, भोजपुरी लेखक परिचय दास यांनी सांगितले की, भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून, तिच्याशी असंख्य व्यक्तिगत आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. ज्या भाषेत आपण आयुष्यभर काम करतो, त्या भाषेचे आपल्या व्यक्तिमत्त्वावरही काहीतरी ऋण असतात. विकिपीडियाच्या आकड्यांनुसार, भारतात १० लाखांहून अधिक लोक भोजपुरी या भाषेचा वापर दैनंदिन व्यवहारांसाठी करतात. कैथी ही भोजपुरी भाषेची मूळ लिपी असून, तिचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)>तज्ज्ञांच्या मते़़़अहिराणी भाषेचे महत्त्व सांगताना, प्रसिद्ध अहिराणी लेखक रमेश सूर्यवंशी यांनी सांगितले, संत ज्ञानेश्वरांच्या पवित्र ज्ञानेश्वरीमध्ये अहिराणी भाषेचा वापर केला गेला आहे. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात मौर्य व वाकाटाका यांच्या साम्राज्यात या भाषेचा जन्म झाला. महाराष्ट्रातील जळगाव व धुळे भागात दीड कोटी लोक अहिराणी भाषा बोलतात. मराठी भाषेची गणना जर जगातील सर्वांत श्रीमंत भाषांमध्ये करायची असेल, तर अहिराणीसारख्या मराठीच्या बोलीभाषांनाच त्याचे जास्तीत जास्त श्रेय जाते. मराठी भाषेची परंपराच तिच्या बोलीभाषांमध्ये वसलेली आहे. कोसली ही ओरिसा राज्यातील पुरातन बोलीभाषा आहे. रामायण, महाभारत, भागवत यांसारखी पुरातन महाकाव्ये कोसली भाषेत लिहिली गेली आहेत. कोसली भाषेतील साहित्याला मर्यादा घालत, त्यांतील साहित्याचे इतर भाषांमध्ये रूपांतर फारच कमी प्रमाणात केले गेले आहे. भारतीय घटनेत कोसली भाषेचा आठव्या क्रमांकावर अंतर्भाव करण्यात यावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथ सिंह यांना लेखी अर्ज केला आहे, असे प्रसिद्ध कोसली कवी पद्मश्री हलधर नाग म्हणाले.