शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

केंद्राच्या निर्णयावर नाराज, अजित पवारांचं अमित शाह यांना पत्र; दिल्लीला जाऊन भेटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 15:01 IST

केंद्राच्या निर्णयाला महायुतीत असणाऱ्या घटकपक्षांनी केलेल्या विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात येतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई : अवकाळी पाऊस आणि कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं असतानाच केंद्र सरकारने उसापासून होणाऱ्या इथेनॉल निर्मितीवर बंदीचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने साखर कारखानदार अडचणीत सापडणार असून याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरही होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवत इथेनॉल निर्मितीबाबत घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.

केंद्र सरकारकडून इथेनॉलबाबत घेण्यात आलेला निर्णय ग्राहक आणि अन्नपुरवठा विभागाच्या दृष्टीने योग्य असला तरी उसाच्या उद्योगात हजारो शेतकरी गुंतलेले आहेत. त्यामुळे या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा, अशी विनंती पत्राद्वारे अजित पवार यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे.

अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात अजित पवारांनी म्हटलं आहे की, "उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी घातल्यास हा उद्योग अडचणीत येईल. इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा उद्योग अडचणीत आल्यास कारखान्यांचं मोठं आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे आपण निर्णयाचा पुनर्विचार करावा."

दरम्यान, या मुद्द्यावर अमित शाह यांची भेट घेण्यासाठी अजित पवार आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्राच्या निर्णयाला महायुतीत असणाऱ्या घटकपक्षांनी केलेल्या विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात येतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जयंत पाटलांनीही उपस्थित केला मुद्दा

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात इथेनॉलबंदीचा मुद्दा उपस्थित केला. केंद्र सरकारने इथेनॉलबाबत घेतलेल्या निर्णयावर हल्लाबोल करताना जयंत पाटील म्हणाले की, "केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशभर फिरून सांगत आहेत की, आम्ही पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करून कोट्यवधी रुपयांचं परकीय चलन वाचवत आहोत. मात्र हेच गडकरी बैठकीत नसताना नुकतंच केंद्र सरकारने उसापासून तयार करण्यात आलेले इथेनॉल न घेण्याचा निर्णय घेतला. तुम्हीच व्याजदर कमी करून कर्ज देत इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिलं होतं. मात्र आता साखरेचा भाव वाढतोय, हे लक्षात येताच इथेनॉल बंदी केली. सरकारने शेतकऱ्याला अडचणीत आणायचं ठरवलं आहे," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडलं आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAmit Shahअमित शाहNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा