शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

दहीहंडीविषयी पुनर्विचार याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 5:43 AM

दहीहंडीविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर गोविंदा प्रतिनिधींनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

मुंबई : दहीहंडीविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर गोविंदा प्रतिनिधींनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नाराजी पसरलेल्या गोविंदांनी वेळोवेळी संताप व्यक्त केला. शिवाय, राजकीय नेत्यांच्या दारी जाऊन निर्णयात तडजोड करण्यासाठी भेटीगाठीही घेतल्या. मात्र, पदरी निराशा आल्यानंतर मंगळवारी गोविंदा प्रतिनिधींचा चमू दिल्लीला रवाना झाला. या प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेल्या वर्षी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक थरांचा विक्रम करणाऱ्या जोगेश्वरीच्या जय जवान मंडळाने आपल्या विक्रमाचे प्रमाणपत्र राष्ट्रपतींना परत देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक मनोऱ्यांचा स्पेनचा २२ वर्षांचा विक्रम या मंडळाने गेल्या वर्षी मोडीत काढला होता. केवळ पुरस्कारवापसीच्या भूमिकेवर न थांबता, याचिका दाखल करण्यासाठी जय जवानचे पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी दिल्लीलाही रवाना झाले. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सुरक्षेची सर्व काळजी घेऊ, असे आश्वासन जय जवान मंडळाने दिले आहे.>राज ठाकरे निर्णयावर ठाम, नऊ थरांचा ‘थरार’ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे केलेल्या वक्तव्यानंतर गोविंदा पथकांनी यांची भेट घेतली होती. मंगळवारी पुन्हा गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांची भेट घेऊन या निर्णयाविषयी चर्चा केली. या भेटीत राज यांनी आपली भूमिका कायम राखत उत्सव साजरा करण्यास पाठिंबा दर्शविला. याच धर्तीवर ठाणे येथे नऊ थरांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केवळ हिंदूंच्याच सणाला नियमावली का? दुखापत होईल म्हणून आॅलिम्पिक रद्द करणार का, मग पारंपरिक दहिहंडीला नियमात का अडकवता? असे सवाल करत दहिहंडीवरुन न्यायालय आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला.