शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अलमट्टीतून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग, पुराचा धोका टाळण्यासाठी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 13:05 IST

कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस लक्षात घेऊन महाराष्ट्र जलसंपदा विभागाने कर्नाटकच्या जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार केला आहे.

सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील महापुराचे संकट टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी ५१३ मीटरपेक्षा जास्त ठेवू नये, अशी विनंती महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाने कर्नाटकला केली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पाचनंतर अलमट्टीतून एक लाख २५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला.कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस लक्षात घेऊन महाराष्ट्र जलसंपदा विभागाने कर्नाटकच्या जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, बदलत्या पर्जन्यमानाचा विचार करून, खबरदारीचा उपाय म्हणून आणि आंतरराज्यीय समन्वय बैठकीत चर्चा केल्यानुसार, पुरेशी पातळी राखावी आणि नियमन करावे. उप-खोऱ्यातील सुरळीत निरीक्षणासाठी धरणातून विसर्ग वाढवावा. अलमट्टी धरणात दि. १५ ऑगस्टपर्यंत ५१३ मीटरपेक्षा जास्त पाणीपातळी ठेवू नये.त्यानुसार अलमट्टी जलाशयाच्या अधीक्षक अभियंत्यांनी बुधवारी सायंकाळी पाचनंतर पाण्याचा विसर्ग एक लाख २५ हजार क्युसेकपर्यंत वाढविला आहे. सध्या अलमट्टी धरणात ८८.५०३ टीएमसी पाणीसाठा आहे. पाणीपातळी ५१७.३२ मीटर आहे. कृष्णा खोऱ्यात पावसाचा जोर असल्यामुळे अलमट्टी धरणात एक लाख चार हजार ३०५ क्युसेक पाण्याची आवक होत आहे, तर धरणातून एक लाख २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.

अलमट्टीतील अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय : मिलिंद नाईक

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांना महापुराचा धोका पोहोचू नये, यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. अलमट्टीतील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी रोज संपर्क आहे. जल आयोगाच्या नियमानुसार ५१३ मीटर पाणीपातळी ठेवण्यासाठीही विनंती केली आहे. अलमट्टी धरणात एक लाख चार हजार ३०५ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातून एक लाख २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे, अशी माहिती जलसंपदाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांनी दिली.

चार दिवस पावसाचेहवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात दि. १७ जुलैपर्यंत संततधार पाऊस सुरूच राहील, असा अंदाज आहे. कोयना, वारणेसह राधानगरी, धोम, कण्हेर या पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. यामुळे कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांचा महापूर टाळण्यासाठी अलमट्टीतून विसर्ग दोन लाख क्युसेक करण्याची गरज आहे, असे मत सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस