शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
5
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
6
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
7
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
8
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
9
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
10
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
11
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
12
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
13
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
14
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
15
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
16
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
17
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
18
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
19
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
20
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलावरून मतभेद; उघडपणे २ भूमिका समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 20:57 IST

प्रदेशाध्यक्ष बदलणार अशा बातम्या वृत्तपत्रात वाचून आम्हाला हसू येते असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला. 

मुंबई - गेल्या २ दिवसांपासून शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत पक्ष संघटनेत बदल करावेत अशी मागणी पुढे येत असून त्यात प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही बदललं जावं असं म्हटलं जात आहे. त्यात पक्ष संघटनेतील या बदलावरून राष्ट्रवादीतील २ मतप्रवाह समोर आले आहेत. त्यातील एका गटाला पक्ष संघटनेत बदलाची गरज नाही असं वाटते तर काहींनी नव्या लोकांना संधी द्यावी अशी मागणी केली आहे. 

विधानसभेत पक्षाला फटका बसल्यानंतर पक्ष संघटनेत बदलाचे वारे वाहू लागले आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी आगामी काळात पक्ष संघटनेत बदल केले जातील हे संकेत शरद पवारांनी दिले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू आहे. त्यातच रोहित पवार यांनीही अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्ष बदलाची गरज असल्याचं सूचवलं आहे. 

रोहित पवार म्हणाले की, अनुभव हा महत्त्वाचा आहे परंतु संघटनेत जो काम करतोय त्याला कुठलीतरी महत्त्वाची जबाबदारी दिली गेली आणि त्यात नेत्यांचे मार्गदर्शन पदाधिकारी, कार्यकर्त्याला मिळू शकेल. सामान्य कुटुंबातील कुणी पदावर आले तर त्याचे स्वागतच सगळे करतील पण शेवटी निर्णय शरद पवारांचा आहे असं त्यांनी सांगितले. तर ज्या पदाधिकाऱ्यांचे २-३ टर्म झालेत. संघटनेच्या संविधानानुसार ३ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होऊनही अनेकजण पदावर आहेत. त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे असं विधान करत पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी करत जयंत पाटलांनीही राजीनामा द्यावा अशी अप्रत्यक्षपणे मागणी केली आहे. 

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष बदलणार अशा बातम्या वृत्तपत्रात वाचून आम्हाला हसू येते. पक्षात आम्ही काम करतोय, आम्हाला जास्त माहिती असेल. कार्यकर्त्यांमध्ये थोडी मरगळ आली होती. शरद पवारांना पाहिले आणि त्यांचे शब्द कानावर पडले त्यासाठी ही बैठक होती. जेवढी मेहनत जयंत पाटील यांनी पक्षासाठी केली, पक्षाला वेळ दिला. यश-अपयशावर अध्यक्षपद ठरत नाही. लोकसभेत यश मिळालं ते जयंत पाटलांमुळे आणि सहा महिन्यांनी विधानसभेला अपयश मिळाले ते जयंत पाटलांमुळे, म्हणून त्यांना पदावरून काढून टाकायचे हे कुठले नवीन गणित आहे असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलJitendra Awhadजितेंद्र आव्हाडRohit Pawarरोहित पवार